J&K Books Ban :  राष्ट्रऐक्याला धोका पोचवणार्‍या २५ पुस्तकांवर जम्मू-काश्मीरमध्ये बंदी

अरुंधती रॉय यांच्या ‘आजादी’ या पुस्तकाचाही समावेश

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरच्या गृह विभागाने विभाजनवादी भावना वाढवणार्‍या आणि देशाच्या ऐक्याला धोका पोचवणार्‍या २५ पुस्तकांवर बंदी घातली आहे. सरकारने या सर्व पुस्तकांचे प्रकाशन, वितरण आणि विक्री यांवर बंदी घातली असून बाजारातून ही पुस्तके जप्त करण्याचा आदेश दिला आहे.

अरुंधती रॉय

१. राज्य प्रशासनाने स्पष्टपणे म्हटले आहे की, या पुस्तकांमध्ये ऐतिहासिक तथ्ये मोडून-तोडून मांडली गेली आहेत, तसेच आतंकवाद्यांचे चित्रण नायकासारखे करण्यात आले आहे.

भारतीय सैन्य आणि सुरक्षादल यांची प्रतिमा अपकीर्त करण्याचा प्रयत्न झाला आहे, तसेच धार्मिक कट्टरतेला उत्तेजन देण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.

२. या पुस्तकांवर युवकांना हिंसेकडे प्रवृत्त करणारी विचारसरणी पसरवण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ही पुस्तके भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १५२, १९६ आणि १९७, तसेच भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम ९८ अंतर्गत जप्त करण्यात आली आहेत.

संपादकीय भूमिका

केवळ पुस्तकावर बंदी घालून थांबू नये, तर संबंधित लेखकांवरही कारवाई करावी !