पावसाळ्यात विविध गुणधर्म असणार्या अनेक वनस्पती उगवतात, त्यातील अनेक वनस्पती या खाण्यायोग्य असतात. विशेषत: आदिवासींनी या शोधून काढल्या आहेत. अनेक पिढ्यांपासून त्या जपल्याही आहेत. या रानभाज्यांना ओळख मिळवून त्यांची लागवड, उत्पादन, विक्री अशी साखळी निर्माण करून शेतकर्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास साहाय्य मिळणार आहे. आज ‘बांबू’ या रानभाजीची माहिती येथे देत आहे.
(भाग ९)
याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/941815.html

१. तंतुमय ‘बांबू’
आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या ‘थ्री सिस्टर्स’ राज्यांमध्ये पर्यटकांना प्रामुख्याने जागोजागी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पांढरे कोंब भरून ठेवल्याचे आढळते. हे बांबूचे लोणचे असते. या राज्यांमध्ये खास करून आदिवासींच्या जीवनाजवळ नेणारी खास ‘खरोली’ थाळी इथे मिळते. या थाळीमध्ये सर्व रानभाज्यांचे पदार्थ असतात. बांबूच्या कोवळ्या कोंबापासून भाजी, लोणचे असे पदार्थ पर्यटनाच्या निमित्ताने चाखायला हरकत नाही.

बांबू ही खूपच तंतुमय, तसेच ही क्षारयुक्त वनस्पती असल्यामुळे शरिराला तंतू आणि क्षार दोन्ही मिळतात. बाळंतपणात गर्भाशयाची पूर्ण शुद्धी होण्यासाठी ही भाजी बाळंतिणीला देतात. या भाजीमुळे भूक आणि पचनशक्ती दोन्ही वाढते. बांबू पिकला की, खोडाच्या पेरात एक स्राव जमा व्हायला लागतो. त्यास ‘वंशलोचन’ म्हणतात. हे दम्यावरील उत्तम औषध आहे. बांबूच्या मुळांचा रस स्थूलता आणि मधुमेह विकारांवर रामबाण उपाय आहे.
१ अ. भाजी करण्याची पद्धत
कोंब आल्यावर त्याची साले काढून तो बारीक चिरून रात्रभर पाण्यात घालून ठेवायचा. दुसर्या दिवशी सकाळी हे पाणी काढून टाकायचे आणि नव्या पाण्यात कोंब घालून कुकरच्या ३ शिट्टया काढायच्या. त्यामधील पाणी काढून टाकायचे. कढईत तेल तापवून जिरे, मोहरी, हिंग, हळद, बारीक चिरलेला कांदा, थोडी चणाडाळ आणि चवीपुरते मीठ घालून फोडणी करावी. कांदा शिजला की, तिखटासमवेत वाफवलेले कोंब घालायचे. गुळ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण ठेवून एक वाफ काढावी. हवे असल्यास ओले खोबरेसुद्धा यामध्ये घालता येते.
– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.
यापुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/942969.html
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?