(म्हणे) ‘पहलगाम आक्रमणामागे पाकिस्तान असल्याचे जग स्वीकारायला सिद्ध नाही ! – Mani Shankar Aiyar

पाकप्रेमी काँग्रेसी नेते मणिशंकर अय्यर यांचे राष्ट्रघातकी विधान

काँग्रेसी नेते मणिशंकर अय्यर

नवी देहली – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणावरून पाकिस्तानला उघडे पाडण्यासाठी आपले खासदार जगभर फिरले; पण कुणीही आपले ऐकले नाही. आपण छाती बडवून सांगितले की, ‘पहलगाम आक्रमणाला पाकिस्तान उत्तरदायी आहे’; पण कुणीही त्यावर विश्वास ठेवण्यास सिद्ध नाही. संयुक्त राष्ट्रे आणि अमेरिका यांनीही पाकिस्तानला उत्तरदायी धरलेले नाही; कारण आपण कोणतेही पुरावे सादर करू शकलो नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि आतंकवादाविरुद्ध भारताची भूमिका यांविषयी माहिती देण्यासाठी ३३ देशांमध्ये ७ शिष्टमंडळे पाठवली होती. या शिष्टमंडळात विविध राजकीय पक्षांचे ५१ नेते आणि ८ राजदूत यांच्यासह ५९ सदस्य होते.

संपादकीय भूमिका

जगाचा विचार करण्यापेक्षा काँग्रेसही स्वीकारायला का सिद्ध नाही ?, याचे उत्तर अय्यर यांनी आधी द्यावे ! पाकिस्तानची निर्मिती काँग्रेसमुळे झाल्याने गेली ७८ वर्षे सर्व प्रकारे पाकला पाठीशीच घालत आली आहे आणि घालत आहे !