
मुंबई – वर्ष २००६ मधील मुंबई साखळी बाँबस्फोटातील १२ आरोपींची निर्दाेष सुटका केल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या बहुचर्चित निर्णयाला सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्यशासनाने सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर २४ जुलै या दिवशी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वाेच्च न्यायालयाने वरील निर्णय दिला.
हा निर्णय देतांना निर्दाेष म्हणून कारागृहातून मुक्त केलेल्या आरोपींना पुन्हा कारागृहात जाण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. न्यायमूर्ती एम्.एम्. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन्.के. सिंह यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. महाधिवक्ता तुषार मेहता यांनी महाराष्ट्र शासनाची बाजू मांडतांना ‘जरी दोषींना निर्दोष ठरवून त्यांना कारागृहाच्या बाहेर सोडले असले, तरी त्यांना पुन्हा कारागृहात आणण्याचा प्रश्न नाही; पण या निर्णयाचा परिणाम अन्य ‘मकोका’ खटल्यांवर होऊ शकतो. हा निर्णय अन्य खटल्यांमध्ये वापरला जाईल आणि त्याचा फटका पोलीस, अन्वेषण आणि अन्य यंत्रणा यांना बसू शकतो’, असे नमूद केले.
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट
देवता, भारतमाता आणि राजकीय हुतात्मा यांच्या नावाने शपथ घेतली जाऊ शकत नाही ! – Kerala High Court
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे दोषी; २९ जूनला सुनावणार अंतिम शिक्षा
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe