
मुंबई – वर्ष २००६ मधील मुंबई साखळी बाँबस्फोटातील १२ आरोपींची निर्दाेष सुटका केल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या बहुचर्चित निर्णयाला सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्यशासनाने सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर २४ जुलै या दिवशी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वाेच्च न्यायालयाने वरील निर्णय दिला.
हा निर्णय देतांना निर्दाेष म्हणून कारागृहातून मुक्त केलेल्या आरोपींना पुन्हा कारागृहात जाण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. न्यायमूर्ती एम्.एम्. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन्.के. सिंह यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. महाधिवक्ता तुषार मेहता यांनी महाराष्ट्र शासनाची बाजू मांडतांना ‘जरी दोषींना निर्दोष ठरवून त्यांना कारागृहाच्या बाहेर सोडले असले, तरी त्यांना पुन्हा कारागृहात आणण्याचा प्रश्न नाही; पण या निर्णयाचा परिणाम अन्य ‘मकोका’ खटल्यांवर होऊ शकतो. हा निर्णय अन्य खटल्यांमध्ये वापरला जाईल आणि त्याचा फटका पोलीस, अन्वेषण आणि अन्य यंत्रणा यांना बसू शकतो’, असे नमूद केले.
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !
Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप