पावसाळ्यात घ्यावयाची काळजी !

मुख्यतः पावसाळ्यामुळे अपरिहार्यपणे असणारी फळे आणि भाज्या वाहतुकीमध्ये अस्वच्छ होतात. परिणामी जंतूसंसर्ग न होण्यासंबंधी काळजी घेण्याच्या अनुषंगाने :

१. बाहेर खायची वेळ आली असता गरम, उकळलेले आणि शिजवलेले खावे. सँडविच, पाणीपुरी, भेळ, फळांचा रस, ‘फ्रूट प्लॅटर’ (फळांचे ताट) आणि ज्या ज्या पदार्थात कच्च्या भाज्या असतात, असे सब्स, बर्गर, सॅलड टाळावेत. उपाहारगृहात पालेभाजीमिश्रित भाज्या जसे पालक पनीर, मेथी लहसुनी वगैरेही टाळलेल्या बर्‍या.

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

२. कोठा हलका असता सकाळ-संध्याकाळ चिमूट चिमूट सुंठ पावडर घ्यायला हरकत नाही. घरात महापालिकेचे पाणी पिण्यासाठी वापरत असल्यास उकळून गार करून किंवा कोमट प्यावे. (२१.७.२०२५)

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.