मुख्यतः पावसाळ्यामुळे अपरिहार्यपणे असणारी फळे आणि भाज्या वाहतुकीमध्ये अस्वच्छ होतात. परिणामी जंतूसंसर्ग न होण्यासंबंधी काळजी घेण्याच्या अनुषंगाने :

१. बाहेर खायची वेळ आली असता गरम, उकळलेले आणि शिजवलेले खावे. सँडविच, पाणीपुरी, भेळ, फळांचा रस, ‘फ्रूट प्लॅटर’ (फळांचे ताट) आणि ज्या ज्या पदार्थात कच्च्या भाज्या असतात, असे सब्स, बर्गर, सॅलड टाळावेत. उपाहारगृहात पालेभाजीमिश्रित भाज्या जसे पालक पनीर, मेथी लहसुनी वगैरेही टाळलेल्या बर्या.

२. कोठा हलका असता सकाळ-संध्याकाळ चिमूट चिमूट सुंठ पावडर घ्यायला हरकत नाही. घरात महापालिकेचे पाणी पिण्यासाठी वापरत असल्यास उकळून गार करून किंवा कोमट प्यावे. (२१.७.२०२५)
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !