‘ऑपरेशन सिंदूर’वरून पाकची अजित डोवाल यांच्यावर टीका

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारतीय सैन्याने पाकमधील ९ आतंकवादी ठिकाणे अचूकपणे उद्ध्वस्त केली. विशेष म्हणजे या संघर्षात भारताची कुठलीही हानी झाली नाही. इतकेच नव्हे, तर भारतात एक काचेचा तुकडाही फुटलेला नाही, या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केलेल्या विधानावर पाकने टीका करत ‘डोवाल यांनी खोटेपणा केला असून चुकीची माहिती पसरवली आहे’, असा आरोप केला.
Pakistan criticises NSA Ajit Doval; accuses him of spreading false information
Doval said Indian forces destroyed 9 terror camps in Pakistan with pinpoint precision — “not even a piece of glass was broken in India.”
Pak FM calls it an attempt to mislead the public. pic.twitter.com/inxtLmO4xZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 12, 2025
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी सांगितले की, डोवाल यांचे वक्तव्य जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. ही एका उत्तरदायी देशाने आंतरराष्ट्रीय नियमांची केलेली पायमल्ली आहे. डोवाल यांचे वक्तव्य राजनैतिक वर्तनाच्या निकषांचेही उल्लंघन करते. भारताने अशा सैनिकी कारवाईचे केलेले गौरवगान संयुक्त राष्ट्रांच्या सनदांचे गंभीर उल्लंघन आहे. भारताने ज्या ठिकाणांना लक्ष्य केले, ती ठिकाणे सामान्य नागरिकांची वस्ती असलेली क्षेत्रे होती आणि त्यामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. भारताच्या या आक्रमक भूमिकेकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. शाश्वत शांततेचा मार्ग संवाद, परस्पर आदर आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन, यांमध्येच आहे.
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या
Israel Spying : इस्रायल करत आहे ट्रम्प सरकारची हेरगिरी ! – अमेरिका
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !
भारतातील घटत्या प्रजनन प्रमाणावर इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !