Rana Sanaullah : भारताने अणूबाँब टाकला आहे कि नाही ?, हे ओळखण्यासाठी पाककडे होते केवळ ४५ सेकंद ! – राणा सनाउल्ला

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्ला यांचा गौप्यस्फोट

राणा सनाउल्ला

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताने जेव्हा पाकच्या रावळपिंडी येथील नूर खान वायूदल तळावर ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रे डागली, त्या वेळी येणार्‍या या क्षेपणास्त्रांमध्ये अण्वस्त्रे आहेत कि नाहीत ?, हे ओळखण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडे केवळ ३० ते ४५ सेकंदांचा वेळ होता.  इतक्या अल्प वेळेत कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यास फारच धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी अण्वस्त्र युद्धाचा धोका वाढला होता, असा गौप्यस्फोट पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्ला यांनी दिली. ते एका वृत्तवाहिनीवर बोलत होते.

सनाउल्ला पुढे म्हणाले की, मी असे म्हणत नाही की, भारताने अण्वस्त्रांचा वापर न करून काही चांगले केले; पण पाकिस्तानने चुकीचा समज करून घेतला असता, म्हणजे अण्वस्त्र आक्रमण झाले, असे गृहीत धरले असते, तर तो जागतिक अणूयुद्धाचा भडका ठरला असता.