Operation Sindoor : आतंकवादी कारवाया करणार्‍यांची काय परिस्थिती होईल, हे आता जगाने पाहिले ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – आतंकवादी आणि त्यांचे प्रमुख यांच्यासाठी सीमेपलीकडील भूमीसुद्धा सुरक्षित नाही. भारताने पाकमध्ये घुसून कारवाई केली आहे. भारतीय सैन्याने शौर्य आणि प्रचंड पराक्रम दाखवत रावळपिंडीपर्यंत मजल मारली. भारतात आतंकवादी कारवाया करणार्‍यांची काय परिस्थिती होईल, हे आता जगाने पाहिले आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथील संरक्षणदलाच्या एका कार्यक्रमात सांगितले.

https://twitter.com/DefenceMinIndia/status/1921476949047980089

‘आतंकवाद्यांवर ठोस कारवाई चालू रहाणार आहे’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. येथील ‘ब्राह्मोस एयरोस्पेस इंटीग्रेशन आणि टेस्टिंग फॅसिलिटी सेंटर’चे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे केले. त्या वेळी ते बोलत होते.