P. P. Mohanji Bhagwat : राष्ट्रविरोधी शक्तींच्या विरोधात एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

नागपूर – या युद्धजन्य स्थितीत आम्ही देशवासियांना आवाहन करत आहोत की, सरकारने दिलेल्या सूचना आणि निर्देशांचे तंतोतंत पालन या काळात करायला हवे आणि सरकारला सहाकर्य करायला हवे. राष्ट्रविरोधी शक्तींच्या विरोधात एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षा यासाठी आवश्यक असलेल्या सरकारच्या सगळ्या प्रयत्नांना पाठिंबा दिला पाहिजे, असे रा.स्व. संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत यांनी म्हटले आहे.


त्यांनी यामध्ये म्हटले आहे की, ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारत सरकारच्या नेतृत्वाखाली सैन्यदलांनी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. जे क्रूर हत्याकांड आतंकवाद्यांनी घडवून आणले आणि भ्याड आक्रममण केले, तेव्हापासूनच देशवासियांच्या मनात ‘पीडित कुटुंबांना, माता-भगिनींना न्याय मिळावा’, ही देशभावना होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आम्ही सरकार आणि सैन्यदले यांचे अभिनंदन करतो.

त्यांनी पुढे म्हटले की,

सरकार आणि सैन्यदल यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवल्याने संपूर्ण देशाचे धैर्य वाढले आहे. त्यांची छाती अभिमानाने फुलली आहे. पाकने जे केले, त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी दिलेले उत्तर ही महत्त्वाची आणि अपरिहार्य कारवाई होती. भारत आणि पाक यांच्यात संघर्षाच्या संकटकाळात आम्ही तम-मन-धनासह देशाच्या, सरकारच्या आणि सैन्यदलांच्या पाठीशी आहोत. पाक सैन्याकडून सामान्य नागरिकांचा विचार न करता आक्रमण केले जात आहे. सीमा भाग आणि धार्मिक स्थळे यांना लक्ष्य केले जात आहे. या घटनांमध्ये ज्यांना प्राण गमवावा लागला, त्यांच्या प्रती आमच्या सहवेदना आहेत.