
मुंबई, २८ एप्रिल (वार्ता.) – ज्यांचे पाकिस्तानवर प्रेम आहे, त्यांनी पाकिस्तानात निघून जावे. हिंदु नाव धारण करून कुणी पाकिस्तानी भारतात राहिला, तर त्याच्या तंगड्या तोडून त्याला पाकिस्तानात पाठवू. पाकिस्तानप्रेमींना भारतात रहाण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्र आणि देशात पाकिस्तानप्रेमींसाठी एक इंचही जागा नाही, अशी चेतावणी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांनी २८ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
काही मुसलमानांना नाहक मारहाण केल्याच्या घटनांवरून समाजवादी पक्षाच्या वतीने अबू आझमी यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता मंत्री नीतेश राणे म्हणाले, ‘‘पहलगाम येथील घटनेवरून सर्वसामान्यांच्या मनात चीड आहे. सर्वसामान्यांच्या भावना तीव्र आहेत. अबू आझमी यांच्यासारख्या मुसलमानांच्या नेत्यांनी औरंगजेबासारख्या जिहाद्यांचे उदात्तीकरण केले, त्याचाच परिणाम सर्व मुसलमानांना भोगावा लागत आहे. त्यांनी जे पेरले, ते आता उगवत आहे. अबू आझमी यांच्यासारख्या मुसलमान नेत्यांच्या कर्माची ही फळे आहेत.’’
शिवसेनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी नीतेश राणे यांच्यावर केलेल्या टीकेविषयी पत्रकारांनी विचारले असता नीतेश राणे म्हणाले, ‘‘आमचे सरकार हिंदुत्वाच्या विचारांचे आहे. शिवसेना किंवा भाजप या हिंदुत्वनिष्ठ पक्षांनी एकमेकांमध्ये लढू नये. जिहाद्यांना हेच हवे आहे. आपली लढाई जिहाद्यांविरोधात आहे. हिंदूंनी पक्ष, झेंडा यांमध्ये न अडकता ‘हिंदू’ म्हणून एकत्र रहावे.’’
महाराष्ट्रात पाकिस्तानच्या झेंड्यावर पाय दिल्याने मुसलमानांनी दंगल घडवली. याविषयी पत्रकारांनी विचारले असता मंत्री नीतेश राणे म्हणाले,‘‘पाकिस्तानच्या झेंड्यावर पाय ठेवल्यावर कुणाला राग येत असेल, तर त्यांनी पाकिस्तानात निघून जावे. जिहाद्यांची जागा पाकिस्तानात आहे. आमच्यासाठी आमचा देश मोठा आहे.’’
आतंकवादी आणि काँग्रेस यांचा ‘डीएन्ए’ एकच !
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या ‘धर्म विचारून गोळ्या घालायला आतंकवाद्यांना वेळ कुठे असणार ? आतंकवादाला धर्म नसतो’, या वक्तव्याविषयी पत्रकारांनी विचारले असता मंत्री नीतेश राणे म्हणाले, ‘‘यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनीच ‘भगवा आतंकवाद’ असा आरोप केला होता. त्या काँग्रेसचे नेते ‘आतंकवादाला रंग नसतो’, हे आता कोणत्या तोंडाने म्हणत आहेत. आतंकवादाचा रंग हिरवा आहे आणि काँग्रेसचा रंगही हिरवा आहे. काँग्रेसच्या नेत्यांची भाषा ही पाकिस्तानप्रेमींची भाषा आहे. आतंकवादी आणि काँग्रेस यांचा ‘डीएन्ए’ एकच आहे.’’
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंच्या पराक्रमाचा इतिहास शिकवायला हवा !‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या अभ्यासक्रमातील मोगलांचा अभ्यासक्रम हटवला जात असल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता नीतेश राणे म्हणाले, ‘‘मोगलांचा इतिहास पुसून टाकणे, ही चांगली गोष्ट आहे. आपल्या युवकांना मोगलांचा नाही, तर भारतीय संस्कृतीवर आधारित इतिहास शिकवायला हवा. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंच्या पराक्रमाचा इतिहास शिकवायला हवा.’’ |