हिंदू संघटनासाठी आवश्यक ‘स्वयंबोध’ आणि ‘शत्रूबोध’ !

१३ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘स्वत:ची ओळख विसरलेला हिंदु समाज, जिहाद म्हणजे काय ?, ‘काफिर’ म्हणजे काय ?’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/902317.html

६. कुराणमधील काही शब्दांचा सोयीनुसार अर्थ लावण्याचा प्रकार 

जिहाद शब्दात काहीतरी गोंधळ आहे. या शब्दाचा मूळ अरबी शब्द ‘जहद’ हा आहे. आणखी एक शब्द आहे, ‘कत्ल’ (हत्या करणे). कुराणात ‘जिहाद’ शब्द ३५ वेळा, तर ‘किताल’ शब्द १२३ वेळा येतो. त्यामुळे आपल्याला आपल्या शब्दावलीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कुराणामध्ये एक आयत आहे. यात जो तिसरा शब्द आहे, तो ‘किताल’ आहे. २ रे प्रकरण आयत क्रमांक २१६ मध्ये ‘अल् कितालू’ शब्द आहे. त्याचे भाषांतर करतांना ते ‘जिहाद’, असे करतात. ‘हिलाली अँड खान’च्या भाषांतरानुसार असे म्हटले जाते; कारण याला जगात सर्वाधिक अधिकृत भाषांतर समजले जाते. याविषयी आपण त्यांच्याशी बोललो, तर ते हे मान्य करत नाहीत. ‘कुणीतरी त्याचे चुकीचे भाषांतर केले असेल’, असे ते म्हणतील. या जगात हे एकच पुस्तक आहे, ज्याचे चुकीचे भाषांतर केले जात असावे.  उदाहरणार्थ मी भौतिकशास्त्र शिकवतो. कोपरनिकसने त्याचा एक सिद्धांत लॅटिन भाषेत लिहिला आहे. लॅटीन भाषेतून ग्रीक भाषेत भाषांतर होते. ग्रीकमधून इंग्रजीमध्ये भाषांतर होते आणि इंग्रजीतील हा सिद्धांत मी हिंदीमध्ये सांगणे चालू केले किंवा मराठीचा पंजाबीमध्ये सांगणे चालू केले, तर कोपरनिकसचा सिद्धांत कधी पालटत नाही. भाषांतर केल्याने अर्थ पालटला, असे कुणी म्हणत नाही, तर मग हे एकच पुस्तक (कुराण) आहे की, ज्याच्या अर्थामध्ये परिवर्तन कसे होते ? अर्थात् ते शक्य नाही.

नीरज अत्री यांचा परिचय

श्री. नीरज अत्री

श्री. नीरज अत्री हे पंचकुला (हरियाणा) येथील विवेकानंद कार्य समितीचे अध्यक्ष आहेत. या अंतर्गत ते स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार करतात. सध्या इतिहासाचे मोठ्या प्रमाणात विकृतीकरण होत आहे. त्याचा शोध घेऊन ते ‘नॅशनल सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च अँड कंपॅरिटिव्ह स्टडीज’ च्या माध्यमातून लोकांसमोर मांडतात. यासमवेतच त्यांनी ‘ब्रेनवाश रिपब्लिक’ हे पुस्तक लिहिले आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून विकृत इतिहास कशा प्रकारे पसरवला जातो, ते उघड केले आहे.

७. ‘हिलाली अँड खान’ भाषांतर काय आहे ? 

जगभरातील लोक सौदी अरेबियामध्ये हज करायला जातात, तेव्हा तेथील सरकार त्यांना जे इंग्रजीचे भाषांतर देते, तेच ‘हिलाली अँड खान’ आहे. त्या अधिकृत भाषांतरामध्ये ‘किताल’ लिहिण्याऐवजी ‘जिहाद’ लिहून सांगितले जाते.

८. जिहाद करणे, हे मुसलमानांचे कर्तव्य !

कुराणामधील एका आयताचा अर्थ हत्या करणे, हा आहे. जिहाद हे तुमचे कर्तव्य असून त्याला दुसरा पर्याय नाही. त्याला प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्य करण्यात आले आहे. एक महंमद बिन कासिम अरेबियातून येऊ शकतो, एक महंमद गझनवी गझनीहून येऊ शकतो, एक बाबर अफगाणिस्तानातून येऊ शकतो. त्याचप्रमाणे भारतात एका भागातील धर्मांध दुसर्‍या राज्यात जिहाद करण्यासाठी जातो. शाहीनबाग येथील धर्मांध जिहाद करण्यासाठी केरळपर्यंत जातो; कारण जिहाद हे त्यांचे कर्तव्य बनले आहे.

९. अल्लाला न मानणारे आणि अल्लासह इतर उपासना करणारे दोन्ही काफीर

अजून एक उदाहरण पहाता येईल. प्रकरण २ रे आणि आयत क्र.१९३ असून त्यात पहिलाच शब्द ‘वा कितालु हूं’ आहे. त्याचे असे भाषांतर केले जाते की, ‘मी त्यांच्याशी तोपर्यंत युद्ध करत राहील, जोपर्यंत तेथे कुणी युद्ध करायला ‘फितना’ रहाणार नाही.’ (आय फाईट देम अनटिल देअर इज नो मोर फितना) ‘फितना’ या शब्दाचे विविध प्रकारे भाषांतर केले जाते. काही ठिकाणी ‘छळ करणे’, असेही भाषांतर करतील. ‘अल्लासह इतर देवांची भक्ती करणे (डिसबिलिव्ह ॲण्ड वरशिपिंग ऑफ अदर अलाँग विथ अल्ला), म्हणजे तुम्ही आपल्या घरात कृष्ण, राम आणि शिव यांची पूजा करत असाल, तर तुम्ही काफिर आहातच; पण त्यासह तुम्ही, ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ म्हणत असाल किंवा अल्लाला मानत असाल, तर तेही ‘फितना’ आहे. ही लढाई आणि किताल, म्हणजे ठार मारणे कुठपर्यंत चालणार आहे ?’

१०. ‘शत्रूबोध’ समजून घ्या !

पुढील प्रकरण विषय क्र. ८ मधील आयत क्रमांक ३९ मध्ये पहिलाच शब्द ‘किताल’वरून येतो. ८ व्या प्रकरणाचे नाव आहे, ‘सुरा अल् अनफाल’. ‘अनफाल’ हा अरबी भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ ‘लुटीचा माल’ असा होतो. त्या पवित्र पुस्तकात एक संपूर्ण प्रकरण ‘लुटीचा माल’ आहे. ‘गझवा’चा अर्थ लढाई नाही, तर छापा मारणे (लुटणे) आहे. तो लुटलेला माल कसा वाटून घ्यायचा, याविषयी एक संपूर्ण प्रकरण आहे. यात त्यांच्या वाचलेल्या मुली आणि त्यांच्या बकर्‍या यांना कसे वाटून घेणार ?, त्यांचा पैसा कसा वाटून घेणार ?, त्यांची चल संपत्ती कशा प्रकारे वाटून घेणार ? मी त्यांच्याशी तोपर्यंत युद्ध करत राहील, जोपर्यंत तेथे कुणी युद्ध करायला ‘फितना’ रहाणार नाही. पुन्हा ‘फितना’ हाच शब्द येतो. पुनःपुन्हा त्यांना हेच शिकवले जाते की, तुम्ही लोकांना तोपर्यंत ‘किताल’ (ठार) करायचे आहे, जोपर्यंत जगभर केवळ इस्लामच शिल्लक रहाणार नाही. जोपर्यंत तुम्ही हा शत्रूबोध ठेवणार, तोपर्यंत आपल्याला त्यांच्याशी लढायचे आहे.

११. ‘हिंदुत्व हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे.’, या वाक्याचा अनर्थ 

काही संप्रदाय त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात. प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटनेला त्यापासून जपले पाहिजे. ‘स्वयंबोध, म्हणजे आपण कोण आहोत’, याची ओळख आपल्याला झाली पाहिजे. आपण सत्याचे उपासक आहोत. आपण ४ पुरुषार्थ मानतो, आपल्याला आपल्या पद्धतीने जगण्याची इच्छा आहे. त्यांची इच्छा असेल, तर ते त्यांच्या पद्धतीने जगू शकतात. आपल्या जीवनात कुणी हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ करत असेल, तर मग एक चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज, जे तुम्हाला सांगतील की, आपण कोण आहोत ते. या स्वयंबोधासह एक वाक्य आणखी येते, ते म्हणजे ‘हिंदुत्व हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे.’ सर्वाेच्च न्यायालयाच्या या वाक्याचा संदर्भ वारंवार दिला जातो. वास्तविक सर्वाेच्च न्यायालयाने म्हटले वाक्य आणि त्याचा संदर्भ काही वेगळाच होता; परंतु आपण ‘हिंदुत्व हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे’, हे एक वाक्य उचलून धरले आहे आणि ते एखाद्या ब्रह्मवाक्यासारखे बोलू लागलो आहोत.

हे बरोबर उलट आहे. ‘इस्लाम हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे (इस्लाम इज वे ऑफ लाईफ). त्यामध्ये जीवन जगण्याचा एकच मार्ग आहे. किती उंचीचा पायजमा असेल ? किती उंचीचा कुडता होणार ? दाढी कशी असेल? तुम्हाला मल-मूत्र विसर्जन करायला जायचे असेल, तर ते कसे जायचे आहे ?’, अशा प्रकारच्या अनेक गोष्ट सांगितल्या आहेत. त्यामुळे एकप्रकारे इस्लाम हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. याउलट हिंदुत्व हा जीवन जगण्याचा एकच मार्ग नाही. हिंदुत्वामध्ये जीवन जगण्याचे अनेक मार्ग आहेत. जोपर्यंत ते जीवन एका विशिष्ट व्याप्तीत (कक्षेत) रहाते.

‘हिंदुत्व हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे’, यांसारखी मोठ्या आवाजात म्हटली जाणारी वाक्ये येतात, तर ती ‘बुद्धीमान विप्र (विद्वान ब्राह्मण) आपण ओळखला असेल, तर आपण केवळ त्याचेच ऐकणार’, अशा पद्धतीची आहेत. त्यासाठी आपल्याला लहान लहान गोष्टी शिकणे आवश्यक आहे. आपल्याला या बोधावरून स्वतःमधील उणिवा समजणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्याला हे वैचारिक युद्ध जिंकण्यासाठी पुष्कळ अडचणी येतील.’

– श्री. नीरज अत्री, अध्यक्ष, विवेकानंद कार्य समिती, हरियाणा.

संपादकीय भूमिका

‘हिंदुत्व’ हा जीवन जगण्याचा एकच मार्ग नाही, तर हिंदुत्वामध्ये जीवन जगण्याचे अनेक मार्ग आहेत !