दोन विवाहांमुळे होणार्‍या अपकीर्तीच्या भीतीपोटी आत्महत्या !

भाईंदर रेल्वेस्थानकात वडील-मुलगा आत्महत्येचे प्रकरण

वसई – भार्ईंदर रेल्वेस्थानकात धावत्या रेल्वेखाली झोपून जय मेहता (वय ३० वर्षे) आणि हरिश मेहता (वय ६० वर्षे) या वडील-मुलाने ७ जुलै या दिवशी आत्महत्या केली होती. जयचे मुसलमान धर्मीय मुलीसमवेत प्रेमसंबंध होते. त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे लग्नही केले होते; पण आपला समाज तिला स्वीकारणार नाही; म्हणून त्याने तिच्यापासून लपवून दाक्षिणात्य मुलीशी प्रेमविवाह केला. हे समजल्यावर दोन्ही पत्नी त्याच्यावर दबाव आणू लागल्या. हे प्रकरण सर्वांना समजल्यास अपकीर्ती होईल, या भीतीपोटी वडील आणि मुलगा दोघांनी आत्महत्या केली. या प्रकरणी कुणाची तक्रार नसल्याने गुन्हा नोंदवण्यात आलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.