पुणे येथे पोलीस निरीक्षकावर टोळक्याचे कोयत्याने आक्रमण !

गुन्हेगार आणि धर्मांध यांच्याकडून वेळोवेळी मार खाणारे पोलीस असणे हे महाराष्ट्राला लज्जास्पद !

पुणे – येथील रामटेकडी परिसरातील वानवडी पोलिसांच्या हद्दीत असलेल्या भागात भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणार्‍या एका साहाय्यक पोलीस निरीक्षकावर टोळक्याने कोयत्याने आक्रमण केले आहे. या आक्रमणात घायाळ झालेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव रत्नदीप गायकवाड असून त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे. आरोपी हा कुख्यात गुन्हेगार असून त्याचे नाव निहाल सिंह असे आहे. या वेळी त्याच्या समवेत राहुल सिंह नावाचा कुख्यात गुन्हेगारही घटनास्थळी होता. त्यांनी पोलिसांवर यापूर्वीही आक्रमण केल्याच्या घटना घडल्या आहेत. (पोलीस मार खातात, यातून पोलिसांना प्रशिक्षण दिले जाते कि नाही ? असा प्रश्न पडतो ! तसेच पहिल्याच वेळी कठोर शिक्षा दिली असती, तर आज ही वेळ आली नसती. – संपादक)

संपादकीय भूमिका

यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक वाटत नाही, हेच लक्षात येते. स्वतःचेही रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?