खोट्या कथानकांविरुद्धचा लढा !

‘सध्याच्या काळात ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) हा शब्द पुष्कळ चर्चेत आहे. ‘नॅरेटिव्ह’ या शब्दाला मराठी किंवा भारतीय भाषांमध्ये नेमका शब्द उपलब्ध नाही; कारण हा आधुनिक विदेशी शब्द आहे. हा शब्द आणि त्याचा वापर सध्या सर्वत्र प्रचलित आहे. जगातील सर्व विचित्रता, विकृती आणि मानसिक विकार यांसाठी तेथीलच इंग्रजी भाषेत शब्द निर्माण केले जातात. ‘नॅरेटिव्ह’च्या माध्यमातून एखादा खोटा विचार, भावना, संवाद किंवा वक्तव्य लोकांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. ते एक कपोलकल्पित कथानक असते आणि हेतुपुरस्सर निर्माण केले जाते. बुद्धीवंत हे ‘नॅरेटिव्ह’ सिद्ध करतात आणि अन्य त्याला प्रसारित करतात. हे ‘नॅरेटिव्ह’ हळूहळू वाढत जाते आणि लोकांच्या मनात भ्रम निर्माण करते. लोक त्यालाच सत्य समजायला लागतात. ‘खोटे बोल; पण रेटून बोल’, अशी एक म्हण आहे. अशा प्रकारच्या ‘नॅरेटिव्ह’मधील द्वेष आणि धोके दाखवून देऊन विरोध केला नाही, तर देशाचा विनाश ठरलेला आहे.

१. भारतातील काही मिथ्याजाल आणि तथ्ये

१ अ. ‘भारताला काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य मिळवून दिले.

तथ्य : ‘भारताला काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य मिळवून दिले’, हे अन्य कोणत्याही खोट्यांपेक्षा मोठे खोटे आहे. प्रत्यक्षात काँग्रेसने मुस्लीम लीगच्या सहकार्याने देशाची फाळणी केली. गांधी, नेहरू आणि पटेल यांच्या छायाचित्रांचे संदर्भ देऊन जनतेला भ्रमित करण्यात आले.

१ आ. भारताला अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले.

तथ्य : स्वातंत्र्याच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. फाळणीच्या वेळी देशाचे २ तुकडे होऊन १० लाख निरपराध लोकांना अमानुषपणे जीव गमवावा लागला. मुस्लीम लीगच्या गुंडांमुळे १ कोटी ५० लाख लोक घरदाराला पारखे होऊन जीवनाच्या अत्यंत हालाखीच्या स्थितीत पोचले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेली जीवितहानी, मानहानी, संपत्तीची हानी, दंगल आणि मानवतेची हत्या जगात आतापर्यंत कुठेही झालेली नाही.

१ इ. गांधी अहिंसेचे पुजारी होते !

डॉ. एस्.आर्. लीला

तथ्य : गांधीं हिंदूंना अहिंसा आणि मुसलमानांना अतीहिंसा शिकवणारे नेते होते. गांधी महात्मा नव्हते. ते हुकूमशाह (डिक्टेटर) होते आणि राजकारणी होते. ‘सर्वांनी आपलेच म्हणणे ऐकले पाहिजे आणि मी सांगेल तेच सत्य’, असे वाटणारे ते हेकेखोर राजकारणी होते. गांधीजींनी नेताजी सुभाषचंद्र बोसांसारख्या महान योद्ध्याला, राष्ट्रभक्ताला आणि अध्यात्मजीवी व्यक्तीला देशातून बाहेर काढले. त्यामुळे राजकारणातून नीती, नियती, निष्ठा आणि राष्ट्रप्रेम निघून गेले. त्याऐवजी स्वार्थ, सजन प्रीती, दृष्टता आणि भ्रष्टता शिल्लक राहिली.

१ ई. मुसलमान अल्पसंख्यांक आहेत.

तथ्य : भारतात हिंदूंच्या नंतर मुसलमान सर्वाधिक संख्येने आहेत. देशातील लोकसंख्येत ३०-३५ कोटी मुसलमान आहेत. पारशी हे खरे अल्पसंख्यांक आहेत; कारण ते ६० सहस्र आहेत. मुसलमान हे देशातील दुसर्‍या क्रमांकाचे बहुसंख्यांक आहेत. त्यामुळे त्यांना अल्पसंख्यांक म्हणून गणले जाऊ नये.

१ उ. ‘हिंदू-मुस्लीम भाई-भाई’ 

तथ्य : ‘हिंदू-मुस्लिम भाई-भाई’, असा धडधडीत खोटा दृष्टीकोन भारत सोडून इतरत्र कुठेही मिळणार नाही. मुसलमान सहस्रो वर्षांपासून हिंदूंचा द्वेष करत आलेले आहेत. ८ व्या शतकाच्या प्रारंभी महंमद बिन कासिम याने सिंधवर आक्रमण करून तेथील राजा दाहीरची हत्या करून महिलांना फरफटत नेल्यापासून आजपर्यंत मुसलमानांचा हिंदुद्वेष चालू आहे. याच कारणामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘देशाचे विभाजन झाल्यावर सर्व मुसलमान पाकिस्तानात गेले पाहिजेत आणि तेथील सर्व हिंदू हिंदुस्थानात आले पाहिजे’, असे वाटत होते. हे त्यांनी त्यांच्या ‘थॉट्स ऑन पाकिस्तान, द पार्टीशन ऑफ इंडिया’ या पुस्तकात सांगितले आहे. हे पुस्तक वर्ष १९४० मध्ये लिहिण्यात आले होते. डॉ. आंबेडकर यांनी स्वातंत्र्य मिळण्याच्या ७ वर्षे आधी ही चेतावणी दिली होती; परंतु काँग्रेसने या अत्यंत योग्य आणि अनेक समस्यांचे मूळ करणार्‍या सल्ल्याचा स्वीकार केला नाही.

१ ऊ. डॉ. आंबेडकर केवळ दलित नेते आहेत.

तथ्य : डॉ. आंबेडकर राष्ट्रवादी हाेते आणि इस्लामचे खरे रूप जाणत होते. भारतीय समाजाच्या लोकसंख्येचे स्वरूप आणि स्वभाव यांचे अध्ययन करणारे ते पहिले राष्ट्रनायक आहेत. हिंदु आणि मुसलमान कधीच एक होऊ शकत नाहीत; कारण मुसलमानांचे मत त्यांना एकरूप होऊन जगू देणार नाही. कुराणमध्ये सर्वांचे इस्लाममध्ये परिवर्तन केले पाहिजे, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. दार उल् हरब (युद्धभूमी. जेथे इस्लामचे शासन चालत नाही असा प्रदेश) आणि दार उल् इस्लाम (जेथे इस्लामचे शासन चालते असा प्रदेश), अशी विभागणी करण्यात आली आहे. मुसलमान नसलेल्यांना ‘काफीर’ समजण्यात येते. अशा प्रकारचे इस्लामी विचार अभ्यासपूर्वक लिहून मुसलमानांचा खरा तोंडवळा उघड करणारे ते पहिले नेते होते. दुर्भाग्य म्हणजे डॉ. आंबेडकरांचे हे अपूर्व चिंतन आणि दृष्टीकोन त्यांच्याच अनुयायांनीच वार्‍यावर सोडले आहेत.

१ ए. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला असून ते देशाच्या विभाजनाला कारणीभूत झाले.

तथ्य : द्विराष्ट्र सिद्धांताची मांडणी सय्यद अहमद खान यांनी केली. तेच पाकिस्तानचे जनक होते. त्यांचे नाव न घेता उगीचच सावरकरांवर आरोप केले जातात. (द्विराष्ट्र म्हणजे हिंदु-मुसलमान वेगवेगळे असल्याने त्यांनी वेगवेगळेच रहावे, असा विचार.) वर्ष १८५७ मध्ये ब्रिटिशांविरुद्ध शस्त्रसज्ज संघर्ष झाला. मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी आणि इतर महावीर अन् विरांगना यांनी ब्रिटिशांना हाकलण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलीदान दिले. काँग्रेसचे लोक त्यांच्या नावांचा उल्लेख करायचे टाळतात. आजही काँग्रेसच्या सभांमध्ये ‘भारत माता की जय’ हा घोष होत नाही. १९ व्या आणि २० व्या शतकांमध्ये बाघा जतिन, अरविंदो घोष, रासबिहारी बोस, शचींद्र सन्याल, बारींद्र घोष, खुदीराम बोस यांसारख्या बंगालच्या देशभक्तांनी, तसेच फडके बंधू, चापेकर बंधू, सावरकर बंधू आदी महाराष्ट्राच्या थोर विरांनी स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली. पंजाबमधील लाला लजपतराय, अजित सिंह, भगत सिंह आणि उत्तरप्रदेशातील रामप्रसाद (बिस्मिल्ला), अशफाकुल्ला खान, चंद्रशेखर आझाद यांनी ‘रिपब्लिकन आर्मी’ स्थापन करून देशभक्तीची ठिणगी चेतवली. नंतर या सर्वांचे वारसदार म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘इंडियन नॅशनल आर्मी’ स्थापन करून ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. भारताच्या जवळ जवळ सर्व भागाला मुक्त करणार्‍या अशा वीरकेसरी नेताजी सुभाषचंद्र बोसांचेही नाव काँग्रेस घेत नाही. नेताजींच्या प्रेरणेमुळे वर्ष १९४६ मध्ये भारतीय सैन्यात उठाव झाला आणि ब्रिटिशांनी भारत सोडला. ब्रिटिशांना सैन्याची भीती होती, अहिंसेची नाही. स्वातंत्र्य आले ते नेताजींच्या शेवटच्या प्रहारामुळे, सशस्त्र क्रांती आणि सैनिकी कारवाया यांमुळे, अहिंसेच्या उपदेशामुळे नव्हे. काँग्रेस क्रांतीकारकांचे स्मरण करत नाही आणि त्यांच्या बलीदानाचे मोल देत नाही. काँग्रेस पक्ष देशातील जनतेची सर्व तर्‍हेने दिशाभूल करत आला आहे.

१ ऐ. या देशात कितीही मोठा गुन्हा झाला, तरी ‘कायदा त्याचा मार्ग घेईल.’ (लॉ विल टेक इट्स ओन कोर्स)

तथ्य : कायद्याला स्वतःचे ज्ञान किंवा बुद्धी आहे का ? अधिवक्ते कायद्याच्या आधारावर न्यायालयात वाद घालतात. एकच गोष्ट वादी आणि प्रतिवादी त्यांच्या मतानुसार मांडतात. खटला जिंकणार्‍याला न्याय मिळत नाही, तर हुशार व्यक्ती खटला जिंकते. कायदा अधिवक्ते आणि न्यायाधीश यांच्या हातातील बाहुले बनला आहे. कायद्याला स्वतःची बुद्धी नाही. उदाहरणार्थ तिस्ता सेटलवाड हिने गुजरात दंगलींच्या वेळी मुसलमानांच्या बाजूने खोटा प्रचार केल्याचे आढळले. तिला २० वर्षांनंतर शिक्षा झाली. वर्ष २००२ मधील दंगलीविषयी २ दशकांनी झालेल्या निवाड्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाने तिची शिक्षा थांबवली. यासाठी रात्री ११ वाजता सरन्यायाधिशांनी न्यायालय बोलावले आणि ‘तिला अटक होऊ नये’, असा आदेश दिला. अशा प्रकारची शेकडो प्रकरणे या देशात चालू आहेत. आता सांगा, कायदा त्याचे कार्य करतो कि धूर्त अधिवक्ते अथवा न्यायाधीश त्यांच्या तालावर कायद्याला नाचवतात ?

१ ओ. भाजप हिंदूंसाठी काम करते.

तथ्य : वर्ष १९४७ पासून वर्ष २०१४ पर्यंत भाजपचे बहुमताचे सरकार नव्हते. वाजपेयी सरकारने सर्वांसाठी काम केले; केवळ हिंदूंसाठी नाही. वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचे बहुमताचे सरकार सत्तेवर आले. वाजपेयी आणि मोदी यांच्यात एक भेद आहे. मोदींनी ते ‘हिंदु राष्ट्रवादी’ असल्याचे उघडपणे सांगितले. तोपर्यंत कुणीही ‘हिंदु’असल्याचे अभिमानाने सांगत नसे. काँग्रेसने हिंदूंना अशा प्रकारे दाबून ठेवले होते. मोदींनी हिंदूंसाठी कोणतेही विशेष कायदे केले नाहीत. काँग्रेसने मुसलमानांसाठी आणलेल्या कायद्यांना त्यांनी हटवले नाही. त्यांनी सर्वांसाठी काम केले. मुसलमानांना ५ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली; पण हिंदूंना अशी सवलत नाही. मोदींनी हिंदूंना अभिमानाने ओळख दिली.

हिंदुहितासाठी कोणत्याही सरकारने कार्य केलेले नाही. काहीही केले, तरी त्याचा बहुतांश लाभ मुसलमानांनाच अधिक होतो. त्यासाठी कारण आहे. हिंदू कोणत्याही सवलतीसाठी रस्त्यावर उतरून लढा देत नाही. सरकार स्वतः पुढे पडून हिंदूंसाठी काही करत नाही. ‘डेड लॉक’सारखी (कोंडी करण्यासारखी) परिस्थिती आहे. ‘काही होऊ शकत नाही’, या जडत्वाने दोघांनाही व्यापले आहे.

१ औ. हिंदू हिंसक असून द्वेष करतात.

तथ्य : काँग्रेसचे राहुल गांधी पक्के हिंदुद्वेषी आहेत. जिहादी मन:स्थितीने तळमळणारा एक रोगी आहे. विश्वाचा गेल्या २ सहस्र वर्षांचा इतिहास वरवर पाहिला, तरी नरसंहारक कोण आहे, हे लक्षात येते. इस्लामचा जिहाद आणि ख्रिस्त्यांचा ‘क्रुसेड’ यांनी कोट्यवधी लोकांची हिंसा केली अन् अनेकांचे धर्मांतर केले.

विश्वशांतीसाठी काया, वाचा आणि मन यांनी कृतीशील होणारे केवळ हिंदूच आहेत. ‘कोविड’ महामारीचा विषाणू कुणी पसरवला ? त्यावर लस शोधून जगातील गरीब देशांना ते देऊन मानवतेचे दर्शन कुणी घडवले ? चीनने रोग पसरवला आणि भारताने त्यावर औषध शोधून दिले. भारताने औषधांचा पुरवठा केला. चिनी विषाणूचा सामना भारतीय औषधांनी केला. केवळ ४ वर्षांपूर्वी घडलेली ही जागतिक घटनाही काँग्रेसचे राहुल यांना समजत नाही. असे लोक लोकसभेत विरोधी पक्ष नेते बनतात. विदेशात हिंदुविरोधी भयाचे प्रमाण वाढत आहे.

राहुल हे वायनाड लोकसभा क्षेत्रातून निवडून आले. वायनाड हे केरळमधील मुसलमानबहुल क्षेत्र आहे. सध्या होत असलेली हिंदु  निंदा, खंडण, द्वेष, नाश आणखीन वाढण्याची लक्षणे दिसत आहेत. भारताच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीला पूर्णपणे बिघडवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. २ सहस्र ४०० वर्षांपूर्वी अलेक्झांडर भारतात आला होता. तो विदेशी असल्याने भारतीय त्याच्या पुढे झुकले. आता हा महाकंटक स्वदेशी असल्याने त्याचा सामना करणे अवघड झाले आहे.

त्यामुळे हिंदूंनी सावध रहायला पाहिजे. जन्माने दिसणारे हिंदू अधिक आहेत; पण त्यांच्या अस्तित्वाची जाणीव असलेले हिंदू २०-३० टक्क्यांहून अधिक नाहीत. हेच भारतीय समाजाच्या सुरक्षिततेला मोठे आव्हान आहे. शत्रू घरात आहे, हेच घरातील हिंदूंना ठाऊक नाही.

१ क. सर्व धर्म समान आहेत.

तथ्य : ‘सर्व धर्म समान आहेत’, हे हिंदूंना चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी सिद्ध केलेल्या अनेक खोट्यांपैकी एक आहे. सर्व धर्मांना एक व्याख्या लागू होत नाही. सनातन धर्माखेरीज इतर सर्व पंथ एका ऐतिहासिक व्यक्तीवर आधारित आहेत. इलाम, ख्रिस्ती, बौद्ध, जैन, शीख इत्यादी सर्व धर्म नाहीत, तर पंथ आहेत.  इस्लाम आणि ख्रिस्ती पंथांमध्ये धर्मांतर करण्याचा धंदा चालतो. भारतात जन्मलेल्या बौद्ध, जैन आणि शीख पंथांमध्ये धर्मांतर करण्याची हाव नाही. सनातन धर्मात तर धर्मांतराची सावलीही नाही. सनातन धर्माचे एकच ध्येय आहे आणि ते म्हणजे आत्मज्ञान. या विशाल भावालाच ‘धर्म’ असे म्हणतात.

इस्लामच्या पवित्र ग्रंथ कुराणामध्ये ‘इस्लाम बाहेरचे सर्व काफिर असून त्यांना मारले पाहिजे’, असे म्हटले आहे. हाच बुद्धीभेद मदरशांमध्ये मुसलमान मुलांना शिकवला जातो. ते ५ वेळा नमाज पठण करतात आणि ‘अल्ला’ हा एकच देव आहे, बाकी कुणी नाही’, असे पुन्हा पुन्हा सांगतात. यामुळे ते इतर धर्मांच्या देवीदेवतांना खोटे म्हणत नीच समजतात. द्वेष, असूया आणि तिरस्कार यांच्या त्यांच्या मूळ ग्रंथांत समाविष्ट करणार्‍या पंथांची सनातन धर्माशी तुलना कशी होऊ शकेल ? त्यामुळे ‘सर्व धर्म समान’, असे म्हणणे खोटे आहे.

२. भाजप कुठे हरला ?

श्रीराममंदिराची निर्मिती हे भाजपचे महत्त्वाचे राष्ट्रकार्य आहे. श्रीराममंदिरासाठी ५०० वर्षांचा महासंघर्ष झाला. ३ सहस्रांहून अधिक रामभक्तांचे बलीदान कामाला आले. २० पिढ्यांची निरंतर अपेक्षा आणि आशा यांचे श्रीराममंदिर उभारणीच्या कार्यामुळे सार्थक झाले. भाजपविषयी सर्व हिंदूंनी कृतज्ञता व्यक्त केली. सहस्रो रामभक्तांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्याचा आदेश देणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देण्यात आला ! मुलायम यांनी गोळ्या झाडण्याचा आदेश दिला असतांना सरकारचे मुख्य सचिव असलेले नरेंद्र मिश्रा यांची मंदिर बांधणीचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली. शिलान्यासापासून प्राणप्रतिष्ठेपर्यंत अनेक मुसलमानांनी ‘श्रीराममंदिर तोडून टाकू’, ‘पुन्हा मशीद बांधू’ असा घंटानाद करूनही सरकारकडून त्याचे खंडण करणारे एक वाक्यही आले नाही, कृती तर दूरच राहिली. सरकारने मुसलमानांच्या धमक्यांना प्रत्युत्तर दिले नाही. जनसामान्यांनी अशा गोष्टींना प्रत्युत्तर दिल्यास त्यांनाच अटक केली जाते. त्यामुळे देशद्रोह्यांचा उत्साह वाढतो…भाजप येथे हरला आहे, असे मला वाटते.

३. हिंदूंनी जागृत होणे आवश्यक !

आज प्रतिदिन असे अपप्रचार राजकीय पक्ष, चित्रपट कलावंत, मुसलमानांच्या संस्था, ख्रिस्ती प्रचारक आणि फसवे हिंदू करत आहेत. अलीकडच्या निवडणुकीत ‘भाजप परत सत्तेवर आला, तर संविधान पालटतील’, असा सहस्रो वेळा खोटा प्रचार केला. त्यामुळे लोकांनी भाजपला हरवण्याचा प्रयत्न केला.

वास्तविक काँग्रेस पक्षाने त्यांच्या स्वार्थासाठी ६० वेळा राज्यघटना पालटली आहे. मूळ प्रस्तावनेत नसलेला ‘सेक्युलर’ (निधर्मी) शब्द इंदिरा गांधींनी घातला. काँग्रेसने अनेक महापापे केलेली असूनही सनातन धर्मियांना हिणवण्याचे काम तिच्यासह इतर पक्षही करत आहेत.

हॉवर्ड, कोलंबिया, ऑक्सफर्ड इत्यादी विदेशी विद्यापिठांमध्ये ‘वोकिझम’ चालू झाले आहे. (जगभरातील प्रस्थापित समाजव्यवस्था, संस्कृती, कुटुंबव्यवस्था यांना छेद देणारी नवी विकृती म्हणजे वोकिझम !) ‘हिंदु जातीयवादी आहेत’, ‘ते दलितांना पायाखाली तुडवतात’, ‘त्यांच्यात समानता नाही’, ‘शेकडो देव आहेत’, असे सांगितले जाते आणि हिंदूंना शोधून त्यांची हिंसा केली जाते. ‘समानता’ म्हणत सनातन धर्मातील समानता नाकारून अत्यंत विकृत रितीने वागत आहेत.

या सर्व जागतिक दुष्कृत्यांच्या मागे इस्लाम, साम्यवादी आणि ख्रिस्ती प्रचारक संघटना काम करत आहेत. यासाठी त्यांना हवे तेवढे आर्थिक साहाय्य मिळत आहे. हे काम मुख्यतः आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोस नावाचा ९२ वर्षीय वृद्ध करत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी त्यांनी शतश: प्रयत्न केले; परंतु देवाच्या कृपेने मोदी थोडक्यात हरण्यापासून बचावले. एकूण सांगायचे, तर जगभरातील दुष्ट शक्ती पुष्कळ जागृत झाल्या आहेत. सर्व प्राचीन संस्कृती नष्ट झाल्या आहेत; पण केवळ भारतात सनातन धर्म अजूनही टिकून आहे. त्याला नष्ट करण्यासाठी शेकडो प्रयत्न चालू आहेत. हिंदूंनी या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.’

– डॉ. एस्.आर्. लीला, लेखिका आणि माजी विधान परिषद सदस्य, भाजप, बेंगळुरू, कर्नाटक. (१९.७.२०२४)