(म्हणे) ‘राज्यात निवडणुकीपूर्वी सांप्रदायिक दंगली व्हाव्यात, ही गृह विभागाची इच्छा !’ – सुषमा अंधारे

बेताल हिंदुद्वेषी विधाने करणार्‍या सुषमा अंधारे !

मुंबई – ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘‘रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केले, तो प्रकार पहाता राज्यात निवडणुकीपूर्वी सांप्रदायिक दंगली व्हाव्यात, ही गृह विभागाची इच्छा असल्याचे दिसते. महाराजांच्या कार्यक्रमांना सरकार उपस्थित रहाते, अशा वेळी गृह विभाग काय करत आहे ? निवडणुकीपूर्वीची ही राजकीय खेळी आहे.’’

स्वतःच्या पक्षाचा आदरपूर्वक उल्लेख करण्यास सांगणार्‍या; पण हिंदूंच्या महाराजांचा एकेरी उल्लेख करणार्‍या सुषमा अंधारे !

एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने अंधारे यांना प्रतिक्रिया विचारतांना त्यांच्या पक्षाचा उल्लेख ‘उबाठा’ असा केला. या वेळी अंधारे यांनी त्यांना पक्षाचा उल्लेख आदरपूर्वक करण्यास सांगितले; मात्र प्रतिक्रिया देतांना त्यांनी कालीचरण महाराज आणि रामगिरी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला.