गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई !

नागपूर – जिल्ह्यातील आमगाव देवळी येथील शेतकरी राहुल गोमासे यांनी काही जणांनी मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरून १२ मार्च या दिवशी शेतातील बांधावर गळफास लावून आत्महत्या केली होती. या संदर्भात पोलीस कारवाई करत नसल्याने पीडितेने गृहमंत्र्यांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी ४ महिन्यांनंतर ६ आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
आत्महत्येपूर्वी राहुल यांनी पत्नी जयश्री यांच्या भ्रमणभाषवर २० ते २५ संदेश पाठवून त्यामध्ये काहींनी मानसिक त्रास दिल्याचे म्हटले होते. दत्तू गोमासे यांची वायफळ रिठी येथे ३.६६ हेक्टर शेती होती. सचिन लकडे आणि सुरेंद्र शेंडे यांच्यासमवेत भूमीच्या आर्थिक व्यवहारात त्याला गुंतवून गावातील मानसिक त्रास देण्यात येत होता. गोमासे यांना अनेकदा पैशांचीही मागणी होत होती.
संपादकीय भूमिका
|
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !
बेडग (सांगली) येथे सिलिंडरचा स्फोट
कळंगुट येथील ‘नाझरी रिसॉर्ट’च्या अवैध बांधकामावर कारवाई
कोकणी संघटनांच्या मराठीविरोधी ठरावाचा मराठी राजभाषा निर्धार समितीकडून निषेध