
१. जेव्हा स्वतःविषयीचा आणि स्वार्थाविषयीचा कोणताही विचार आपल्या मनाला शिवत नाही, तेव्हाच आपल्या हातून सर्वाेत्कृष्ट कर्म घडते. तेव्हाच आपला सर्वांत अधिक प्रभाव पडतो. पूर्णपणे निरपेक्ष व्हा, फलाविषयी पूर्णपणे उदासीन रहा. तेव्हाच तुम्ही यथार्थ कर्म करू शकाल.
२. अशुद्ध विचार वा अशुद्ध कल्पना ही अशुद्ध कर्माएवढीच वाईट आहे. आपल्या इच्छेवर जर आपले प्रभुत्व असेल, तर त्यापासून नेहमी सर्वाेच्च फळाचीच प्राप्ती होईल.
३. आपली चांगली आणि वाईट दोन्ही कर्मे विसरून जा अन् त्यांचा पुन्हा कधीही विचार करू नका. जे झाले, ते झाले. त्याकडे पुन्हा दृष्टी वळवू नका. खुळचट समजुतींचा त्याग करा. साक्षात् मृत्यू जरी समोर उभा ठाकला, तरी दुर्बलतेला स्थान देऊ नका. पश्चात्ताप करत बसू नका. गतकर्मांचा उगीच विचार करत बसू नका. ‘आझाद’ (मुक्त) व्हा !
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !
६ खोल्यांची अनुमती असतांना २५ खोल्या बांधणार्यांना आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्यांना कारागृहात टाका !
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?