परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करतांना उपस्थित बांधव

नेरला (जिल्हा नागपूर) – जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणादायी विचारांनी प्रभावित होऊन येथील पूर्व विदर्भ उपपीठावर ६ जून या दिवशी ६३३ बांधवांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. शास्त्रोक्त विधी आणि वैदिक मंत्रोच्चारांच्या साक्षीने या बांधवांनी हिंदु धर्मात सन्मानपूर्वक पुनर्प्रवेश केला. आजच्या ६३३ बांधवांच्या पुनर्प्रवेशासह आतापर्यंत देशभरात एकूण १ लाख ५५ सहस्र ३९३ हून अधिक बांधवांनी रीतसर आणि सनदशीर पद्धतीने हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. परधर्मियांच्या पाशातून मुक्त होऊन मूळ धर्मात येण्याची संधी मिळाली, याविषयी पुनर्प्रवेशित बांधवांनी कृतज्ञता आणि आनंद व्यक्त केला.