‘सुरेशभाऊ खाडे युवा मंच’च्या वतीने वारकर्‍यांसाठी रेनकोट वाटप !

वारकर्‍यांना रेनकोट वाटतांना सौ. सुमनताई सुरेशभाऊ खाडे आणि माजी महापौर सौ. संगीता खोत

मिरज – आषाढी वारीच्या निमित्ताने ‘सुरेशभाऊ खाडे युवा मंच’ यांच्या वतीने समतानगर येथील गेली १८ वर्षे दिंडीसाठी पायी चालत जाणार्‍या १५० वारकर्‍यांना पावसापासून संरक्षण होण्यासाठी ‘रेनकोट’चे वाटप करण्यात आले. या प्रसंगी सौ. सुमनताई सुरेशभाऊ खाडे, माजी महापौर सौ. संगीता खोत, माजी नगरसेवक विठ्ठलतात्या खोत, अण्णा तोडकर, प्रभाकर तोडकर, विक्रम पाटील यांसह अन्य उपस्थित होते. सौ. संगीता खोत यांनी या उपक्रमाविषयी वारकर्‍यांच्या वतीने ‘सुरेशभाऊ खाडे युवा मंच’चे आभार मानून असा उपक्रम राबवल्याविषयी अभिनंदन केले.