‘सगेसोयरे’च्या विरोधातील याचिकेत तथ्य नाही ! – राज्य सरकारचा न्यायालयात युक्तीवाद

मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – मराठा समाजातील सगेसोयर्‍यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, या मागणीसह प्रविष्ट केलेल्या याचिकेत तथ्य नाही. त्या याचिका फेटाळून लावण्यात याव्यात, अशी मागणी राज्य सरकारने ४ जुलै या दिवशी उच्च न्यायालयात केली आहे. ओबीसी संघटना आणि मंगेश ससाणे यांनी यांच्यासह इतर याचिकाकर्त्यांना यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश देत उच्च न्यायालयाने २ आठवड्यांसाठी सुनावणी स्थगित केली आहे.