५-६ पोलीस कर्मचारी घायाळ

मुंबई – पवई येथील हिरानंदानी भागातील अनधिकृत झोपडपट्टयांवर कारवाईसाठी गेलेले मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस यांच्यावर झोपडपट्टीवासियांनी दगडफेक केली. या वेळी पोलिसांनीही सौम्य लाठीमार केला. ६ जून या दिवशी अनधिकृत झोपडपट्टयांवर कारवाई करतांना दगडफेकीची घटना घडली होती. दगडफेकीनंतर झोपडपट्टयांवरील कारवाई थांबवण्यात आली आहे. दगडफेकीत ५-६ पोलीस कर्मचारी घायाळ झाले. या प्रकारानंतर पवई भागात मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा ठेवण्यात आला असून अद्यापही तणावाचे वातावरण आहे.
संपादकीय भूमिकाअशांना कायदा-सुव्यवस्थेचा धाकच उरला नसल्याचे दर्शवणारी घटना ! |
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !