भाविकांकडून राहून गेलेली रोख रक्कम आणि सोने परत केले !

साईबाबा संस्थानच्या सुरक्षारक्षकांचा प्रामाणिकपणा !

शिर्डी – येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आलेले ४ भाविक सोन्यासह काही रक्कम विसरून गेले होते. काही भाविकाचे पैसे हरवले होते. हे सर्व साहित्य साईबाबा संस्थानच्या सुरक्षारक्षकांनी भाविकांना प्रामाणिकपणे परत केले आहे. जवळपास १ लाखाहून अधिक रुपयांची रक्कम आणि सोने त्यांनी परत केले आहे.