भारतातील निवडणुकांवर विधान करणार्या संयुक्त राष्ट्रांना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सुनावले !

नवी देहली – भारतात निवडणुका कशा घ्याव्यात, हे सांगण्यासाठी कोणत्याही जागतिक संस्थेची आवश्यकता नाही. माझ्यासोबत भारतातील जनता आहे. भारतातील जनता निवडणूक मुक्त आणि निष्पक्ष होतील, याची खात्री देईल. त्याची काळजी नाही, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांना सुनावले.
🚨 UN : "We just hope that everyone is able to vote in India in an atmosphere that is free and fair"
EAM S JAISHANKAR 🔥🔥 : "I don't need the United Nations to tell me our elections should be free and fair. We will ensure that elections are free and fair. You don't worry about… pic.twitter.com/MUek4mvTgH
— Times Algebra (@TimesAlgebraIND) April 5, 2024
संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी २९ मार्च या दिवशी म्हटले होते, ‘आम्हाला आशा आहे की, भारतात प्रत्येकाच्या अधिकारांचे रक्षण केले जाईल. सध्या भारतात निवडणुकीची वेळ आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना निकोप वातावरणात मतदान करण्याची संधी मिळाली पाहिजे.’ पत्रकार परिषदेत दुजारिक यांना देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर भारतात निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाबद्दल विचारण्यात आले. त्यावर उत्तर देतांना स्टीफन यांनी निष्पक्ष निवडणुका घेण्याबाबत म्हटले होते.
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !