
‘श्रीरामाच्या कुळातील राजा खटवांग हा त्रेतायुगातील एक थोर चक्रवर्ती राजा होता. एकदा देव-असूर युद्धामध्ये देवतांची बाजू कमकुवत होऊ लागल्यावर देवतांनी खटवांग राजाला मदतीसाठी बोलवले. खटवांग राजाने देवतांना असुरांच्या विरोधात विजय मिळवून दिला. या युद्धानंतर देवतांनी प्रसन्न होऊन खटवांग राजाला वर मागण्यास सांगितला. त्या वेळी राजाने देवतांना विचारले की, ‘माझे आयुष्य अजून किती शिल्लक आहे ?’ देवतांनी सांगितले ‘केवळ एक मुहूर्त ! (हल्लीची ४८ मिनिटे)’ ते ऐकून राजा खटवांगला ‘स्वतःकडे पुष्कळ अल्प कालावधी शिल्लक आहे’, हे लक्षात आल्यावर तो वर न मागताच स्वर्गातून वायूवेगाने पृथ्वीवर परत आला. त्याने स्वतःची संपत्ती गरीब आणि ब्राह्मण यांना दान केली अन् विष्णुस्तुती केली. त्यानंतर त्याने देहत्याग करून वैकुंठगमन केले.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!