देवेंद्र फडणवीस यांच्यावरील बिनबुडाचे आरोप फेटाळतो ! – आशिष शेलार, आमदार, भाजप

प्रतिकात्मक छायाचित्रं

मुंबई – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच टिकणारे आरक्षण दिले होते. मराठा समाजाला न्यायिक, टिकणारे आरक्षण देणार्‍या देवेंद्रजींवर असे बिनबुडाचे आरोप करणे, हे आम्हाला मान्य नाही. ते असमर्थनीय आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख झाला त्याचे समर्थनच होऊ शकत नाही. राजकीय इतिहास हा कुठे वितुष्ट निर्माण करणारा नाही, असे भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला न्याय मिळावा, आरक्षण मिळावे, या भूमिकेचे भाजपने समर्थनच केले आहे. समाजाने केलेल्या आंदोलनामध्ये अथवा कायदा करतांना मराठा समाजाला अधिकचे मिळावे, या त्यांच्या मागणीला सभागृहामध्ये मी स्वतः आणि आम्ही सगळ्यांनी समर्थन दिले आहे. समाज जी मागणी करत आहे, त्याला पूर्ण करण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया होणे आवश्यक आहे. या कायदेशीर प्रक्रियेला पूर्ण करण्याचे काम मनोज जरांगे यांनी सुद्धा हे मान्य केले होते. मराठा समाजाला न्याय आपण मिळवून देऊ हीच भूमिका सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के आरक्षण दिले आहे. प्रलंबित विषय सुद्धा चर्चेतून सोडवले पाहिजेत. याला राजकीय रंग देणे हे मराठा समाजाला मान्य नाही.