पनवेल येथील भारतनगर झोपडपट्टीत रहाणारे ४ बांगलादेशी नागरिक कह्यात !  

( प्रतिकात्मक छायाचित्र )

पनवेल – येथे बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असल्याची तक्रार सकल हिंदु संघटनांनी पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी या निवेदनाची गंभीर नोंद घेत तातडीने सर्वत्र शोधमोहीम हाती घेतल्यावर ४ बांगलादेशी नागरिकांना कह्यात घेतले. पनवेल शहर पोलीस आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.

पनवेल शहरामध्ये श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी झालेल्या वादामध्ये बाहेरून आलेले आणि भारतीय नागरिक नसलेल्या लोकांनी हिंदूंना मारहाण केल्याचे समोर आले होते. या लोकांना भारतनगर झोपडपट्टीत आश्रय मिळत असल्याची तक्रार हिंदु संघटनांनी केली होती. पोलिसांनी या प्रकरणात २ दिवसांपूर्वी पळस्पे येथे केलेल्या कारवाईत चौघांना कह्यात घेतले.

संपादकीय भूमिका 

कोणे एके काळी पनवेल केवळ हिंदूबहुल होते; मात्र आता तेथे बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट होणे चिंताजनक !