![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2023/11/27222011/BindaTai_anandi_hasya_320.jpg)
‘एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात ‘मनमोकळेपणाचा संवाद’ या सत्रात साधकांना त्यांची ‘व्यष्टी आणि समष्टी साधना’ यांत होत असलेल्या मनाच्या अयोग्य प्रक्रियेविषयी सांगायचे होते. मलाही त्याविषयी सांगायचे होते.
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2024/02/07213346/Shrikant_Borate_2023_C-1.jpg)
त्या वेळी माझ्या मनात ‘मी पुढे जाऊन बोललो, तर सहसाधक माझे कौतुक करतील’, असा विचार येत होता. मी ३ – ४ वेळा उभा राहिल्यावर त्याच वेळी अन्य साधक बोलण्यासाठी पुढे जात असल्याने मला बोलायची संधी मिळाली नाही. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘एखादा साधक बोलत असतांना अन्य साधकांनी स्वतःच्या मनाचीही शुद्धी होत आहे’, असा भाव ठेवायला हवा.’’
मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्यानुसार भाव ठेवल्यावर माझ्या मनाची प्रक्रिया होऊन मन शुद्ध होत गेले आणि ‘मला स्वतःमध्ये पालट करायचे आहेत’, असे वाटू लागले.
मी सूक्ष्मातून गुरुदेवांना विचारले, ‘माझी अशी मनाची प्रक्रिया कशी झाली ?’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी भाव ठेवायला सांगितल्यावर त्यांच्या संकल्पानेच ही प्रक्रिया झाली.’
– श्री. श्रीकांत बोराटे, पुणे (२१.८.२०२३)
|