मुंबई महापालिकेच्या २५ वर्षांच्या कारभाराचे लेखापरीक्षण करण्यात येईल ! – उदय सामंत, मंत्री

उदय सामंत, मंत्री

मुंबई, १२ डिसेंबर (वार्ता.) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने मुंबई महापालिकेच्या मागील २५ वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी महापाकिकेच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी १२ डिसेंबर या दिवशी येथे विधानसभेत दिली.

ते पुढे म्हणाले की, कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेत मोठा आर्थिक अपव्यवहार झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती पुढील अधिवेशनात अहवाल सादर करेल. या प्रकरणी मुंबई महापालिकेच्या सर्वच आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाईल.