
भारतीय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नवीन प्रतीकचिन्ह स्वीकारले असून त्यात आयुर्वेदप्रवर्तक भगवान धन्वन्तरि यांची रंगीत प्रतिमा अंतर्भूत करण्यात आली आहे. यावर ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) सारख्या समाजमाध्यमांवर पाश्चात्त्य वैद्यकांच्या पदवीधरांनी टीकेची राळ उठवली आहे. ‘आय.एम्.ए.’ (इंडियन मेडिकल असोसिएशन) या पाश्चात्त्य वैद्यकांच्या पदवीधरांच्या सगळ्यात मोठ्या खासगी संघटनेने तर हा पालट असंमत असल्याचे पत्र आयोगाला पाठवून दिले आहे. एकीकडे ‘धन्वन्तरि ही आयुर्वेदाची मक्तेदारी नसून आरोग्यदेवता असल्याने ती सगळ्यांनाच लागू आहे’, असे म्हणत आयुर्वेदाची ओळख पुसण्याचा प्रयत्न करायला भारतीयत्वाचा मुखवटा धारण करायचा, तर दुसरीकडे मात्र या प्रत्येक चिन्हाला धर्मांधच नव्हे, तर छद्म विज्ञानाचे प्रतीक म्हणत हिणवत खरा चेहरा दाखवायचा, हे आहे वैद्यक जिहादींचे खरे स्वरूप ! फारच थोडके पाश्चात्त्य वैद्यक पदवीधर या स्वागतार्ह निर्णयाच्या बाजूने समाजमाध्यमांवर बोलत आहेत, हे शोचनीय आहे. जे बोलत आहेत, त्यांचे मनापासून कौतुक.

या स्वागतार्ह निर्णयासाठी भारत सरकारला धन्यवाद ! कोणत्याही दबावाखाली न येता हा निर्णय पालटू नये, ही विनंती ! प्रश्न केवळ आयुर्वेदाचा नसून भारतीय संस्कृती आणि भारतीयत्व यांचा आहे.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (१.१२.२०२३)
(साभार : फेसबुक)
‘एकल अभियाना’च्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात परिवर्तन !
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?