गडचिरोली येथे नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या

गडचिरोली – पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी रामजी आत्राम (वय २७ वर्षे) याची हत्या केली. गेल्या १ मासात नक्षलवाद्यांनी ३ जणांची हत्या केली आहे. रामजी संध्याकाळी ५ वाजता शेतात काम करत असतांना सशस्त्र नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून त्याला ठार मारले. ‘रामजी आम्हाला माहिती देत नव्हता’, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

वारंवार हत्या करून दहशत माजवू पहाणार्‍या नक्षलवाद्यांचा बीमोड सरकार आणि पोलीस कधी करणार आहे ?