लोकसभा निवडणूक २०२४

पणजी, १५ नोव्हेंबर (वार्ता.) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात भित्तीपत्रके, ‘कटआऊट्स’, फलक, झेंडे आदी निवडणूक प्रसारसाहित्य लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करता येणार नाही, अशी सूचना भारतीय निडणूक आयोगाने राजकीय पक्ष, प्रशासन, पोलीस आणि निवडणूक आयोगाचे निरीक्षक यांना देण्यात आल्याची माहिती गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांनी दिली.
मुख्य निवडणूक अधिकार्यांनी पुढे सांगितले की, राजकीय पक्षांना लोकसभेच्या निवडणुकीत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही सरकारी भूमीत किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (‘पब्लिक सेक्टर अंडरटेकींग’च्या) मालकीच्या भूमीत निवडणूक प्रसारसाहित्य लावून मालमत्तेचे विद्रुपीकरण करता येणार नाही.
‘गोवा मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्या’नुसारही सार्वजनिक मालत्तेचे विद्रुपीकरण करता येणार नाही. या नियमाचे उल्लंघन करणार्यांना ६ मास कारावास किंवा ५ सहस्र रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. आगामी निवडणुकीत ‘मालमत्तेचे विद्रुपीकरण कायदा १९८८’चे कठोरतेने पालन करण्यात येणार आहे.
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास सुमारे ५६ लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका दान !
पुणे येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन तपोभूमीचे अस्तित्व अवैध उत्खननामुळे धोक्यात !