मुंबईमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत २ जणांचा होरपळून मृत्यू !

मुंबई – कांदिवली येथील महावीरनगर येथील वीणा संतूर या इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये २ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर घायाळ झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये ८ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. इमारतीमध्ये अडलेल्या अन्य नागरिकांना अग्नीशमनदलाच्या जवानांनी बाहेर काढले. अग्नीशमनदलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे.

सौजन्य न्यूज एक्स