सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी हिंदूंवर दगडफेक !

  • ५ धर्मांध मुसलमानांना अटक !

  • हिंदूंच्या घरात घुसून महिलांशी अश्‍लील वर्तन !

  • मुसलमानांचे हिंदूंच्या विरोधात हिंसाचाराचे पूर्वनियोजित षड्यंत्र असल्याचा हिंदूंचा आरोप !

प्रतिकात्मक चित्र

सीतापूर (उत्तरप्रदेश) – मुसलमानांचे प्रेषित महंमद पैगंबर यांच्या जन्मतिथीच्या निमित्ताने साजर्‍या करण्यात आलेल्या ईदच्या वेळी देशात विविध ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. अशीच एक घटना राज्यातील सीतापूर जिल्ह्यात असलेल्या सदरपूर गावाच्या अंतर्गत येणार्‍या बनवीरपूर गावात घडली. गावात मुसलमानांनी काढलेली मिरवणूक प्रतिवर्षीच्या मार्गाने न जाता अन्य मार्गाने गेली. यावर परिसरातील हिंदूंनी विचारणा केली असता धर्मांध मुसलमानांनी त्यांच्याशी वाद घातला, त्यांना अपशब्द म्हटले, तसेच त्यांना मारहाणही केली.


१. थोड्या वेळाने या प्रसंगाचे दंगलीमध्ये रूपांतर झाले. धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर दगडफेक करण्यास आरंभ केला. या घटनेचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. व्हिडिओच्या आधारे ५ मुसलमानांना अटक करण्यात आली असून २५ अज्ञात लोकांच्या विरोधातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

२. पीडित हिंदूंनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुसलमानांचे या मिरवणुकीच्या माध्यमातून हिंदूंवर आक्रमण करण्याचे पूर्वनियोजित षड्यंत्र होते. त्यांनी आधीपासून त्यांच्या घरांच्या छतांवर विटा आणि दगड जमवून ठेवले होते.

३. धर्मांधांनी हिंदूंच्या घरात घुसून महिलांशी अश्‍लील वर्तनही केले. या सर्व प्रकारामुळे परिसरात तणाव असून हिंदू भयाच्या सावटाखाली आहेत.

५ धर्मांध मुसलमानांना अटक

४. या प्रकरणी सलीम, पुत्तान, इश्तियाक, सानू, अइतुल्ला, सैमुल्ला, रहीम, गुफरान, शीबू, मोइन, कादिर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून अन्य २५ अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

देशातील अन्य राज्यांत नव्हे, तर धर्मांध मुसलमानांच्या विरोधात कठोर कारवाई करणारे योगी आदित्यनाथ यांची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशातही अशा प्रकारे मुसलमान हिंसाचार करत असतील, तर त्यांचा उद्दामपणा कोणत्या स्तराला गेला आहे, हेच यातून लक्षात येते. अशांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता केवळ ‘बुलडोझर’ पुरेसा नसून त्यांच्या अर्थार्जनाच्या साधनांवर प्रतिबंध आणण्यात यावा, अशी मागणी कुणी केल्यास चूक ते काय ?