
मुंबई – मुंबई विमानतळावर उतरणार्या ‘व्ही.एस्.आर्. व्हेंचर्स लेअरजेट ४५’ या खासगी विमानाला १४ सप्टेंबर या दिवशी अपघात झाला. उतरत असतांना विमान धावपट्टीवर कोसळले. हा अपघात एवढा मोठा होता की, विमानाचे अक्षरश: दोन तुकडे झाले. विमानामध्ये एकूण ६ प्रवासी आणि २ कर्मचारी होते. यांतील काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे; मात्र ही संख्या अद्याप समजलेली नाही. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक अनुमान आहे. विशाखापट्टणम येथून हे विमान मुंबईला आले होते. अपघातानंतर विमानतळाची धावपट्टी बंद ठेवण्यात आली आहे.
सिडको परिसरातील तलावांमधील प्रदूषणाची चौकशी होणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
ग्रामीण भागांत २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक अनुज्ञेय ! – डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री
ए.पी.एम्.सी. येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती उत्साहात साजरी
देहू (पुणे) ते पंढरपूर ‘सायकल वारी’ची दशकपूर्ती !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण