
मुंबई – मुंबई विमानतळावर उतरणार्या ‘व्ही.एस्.आर्. व्हेंचर्स लेअरजेट ४५’ या खासगी विमानाला १४ सप्टेंबर या दिवशी अपघात झाला. उतरत असतांना विमान धावपट्टीवर कोसळले. हा अपघात एवढा मोठा होता की, विमानाचे अक्षरश: दोन तुकडे झाले. विमानामध्ये एकूण ६ प्रवासी आणि २ कर्मचारी होते. यांतील काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे; मात्र ही संख्या अद्याप समजलेली नाही. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक अनुमान आहे. विशाखापट्टणम येथून हे विमान मुंबईला आले होते. अपघातानंतर विमानतळाची धावपट्टी बंद ठेवण्यात आली आहे.
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !