मुंबई – मुंबई विमानतळावर उतरणार्या ‘व्ही.एस्.आर्. व्हेंचर्स लेअरजेट ४५’ या खासगी विमानाला १४ सप्टेंबर या दिवशी अपघात झाला. उतरत असतांना विमान धावपट्टीवर कोसळले. हा अपघात एवढा मोठा होता की, विमानाचे अक्षरश: दोन तुकडे झाले. विमानामध्ये एकूण ६ प्रवासी आणि २ कर्मचारी होते. यांतील काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे; मात्र ही संख्या अद्याप समजलेली नाही. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक अनुमान आहे. विशाखापट्टणम येथून हे विमान मुंबईला आले होते. अपघातानंतर विमानतळाची धावपट्टी बंद ठेवण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावर खासगी विमानाला अपघात !
नूतन लेख
- ५ मे या दिवशी उंच लाटा येण्याची शक्यता
- कर्करोगाशी लढणार्या पुणे येथील ‘दिव्यांश’ची कहाणी ‘ब्लेझ : एका पुत्राची अग्नीपरीक्षा’ या पुस्तकाने प्रकाशित !
- मतदानासाठी मुंबईत मेट्रो प्रशासनाची तिकिटात १० टक्के सवलत !
- नेहा हिरेमठच्या मारेकर्याला फाशी झाली पाहिजे !
- केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; मात्र मोठे निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकरी अप्रसन्न !
- श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महारुद्र स्वाहाकार आणि अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा !