गृहमंत्री फडणवीस यांचे त्‍यागपत्र घ्‍या ! – उद्धव ठाकरे

जालना – ‘मराठा क्रांती मोर्चा’तील आंदोलक लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. हे आंदोलक आतंकवादी नाहीत. ते शांततेच्‍या मार्गाने उपोषण करत होते. त्‍यांच्‍यावर या सरकारने अमानुषपणे पोलिसांच्‍या साहाय्‍याने लाठीमार केला. त्‍या आंदोलकांची ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. तेव्‍हा त्‍यांनी आंदोलक आणि घायाळ झालेल्‍यांची विचारपूस केली. या वेळी त्‍यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या त्‍यागपत्राची मागणी केली.