झारखंडमधील वाढता जिहादी उपद्रव आणि त्‍यावरील उपाय

बिहार राज्‍याचा एक भूभाग १५ नोव्‍हेंबर २००० या दिवशी वेगळा करून झारखंड हे घटकराज्‍य अस्‍तित्‍वात आले. त्‍याला ५ मासांनी २३ वर्षे होतील. या कालखंडात बांगलादेशातील घुसखोरांची संख्‍या वेगाने वाढत आहे. ‘घुसखोर हे भारतात येण्‍याआधीच त्‍यांची ओळखपत्रे सिद्ध केली जात आहेत’, अशी बातमी ‘टीव्‍ही ९’च्‍या हिंदी वृत्तवाहिनीवरून देण्‍यात आली.

१. झारखंडमधील ६ जिल्‍हे इस्‍लामी करण्‍यासाठी आखण्‍यात आलेली योजना !

श्री. दुर्गेश परुळकर

झारखंडच्‍या संथाल परगण्‍यातील गोड्डा, साहिलगंज, दुमका, पाकुड, देवघर आणि जामताडा या ६ जिल्‍ह्यांतील जिहादी उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हा सगळा भूभाग इस्‍लामी करण्‍याच्‍या हेतूने जिहाद्यांची वाटचाल वेगाने चालू आहे. त्‍यासाठी एक योजना आखण्‍यात आली असल्‍याचे निदर्शनास आले आहे.

अ. या ६ जिल्‍ह्यांत मुसलमानांची लोकसंख्‍या वाढवणे.

आ. हिंदु मुलींना प्रेमाच्‍या जाळ्‍यात ओढणे, त्‍यांच्‍याशी लग्‍न करणे, त्‍यांना धर्मांतरित करणे आणि घर जावई होणे.

इ. हिंदु मुलगी विवाह करण्‍यास सिद्ध झाली नाही, तर तिची हत्‍या करणे.

ई. लग्‍नानंतर भूमी आणि संपत्ती हडप करणे.

उ. वनवासी क्षेत्रातील विद्या मंदिरांचे मदरशात रूपांतर करणे. ऊ. सामान्‍य शाळांमधील प्रार्थनांचे रूपांतर मदरशातील प्रार्थनेत करणे.

ए. खोटे आधार कार्ड सिद्ध करणे.

ऐ. रविवारच्‍या ऐवजी शुक्रवारी साप्‍ताहिक सुट्टी घोषित करणे.ओ. व्‍यवस्‍थापकीय अधिकार प्राप्‍त करणे.

औ. शासनव्‍यवस्‍थेत स्‍वतःचा जम बसवणे.

अं. सत्तेवरील स्‍वतःची पकड घट्ट करणे

याआधारे संपूर्ण क्षेत्राचे इस्‍लामी क्षेत्र करणे वेगाने चालू आहे.

२. झारखंडमध्‍ये सरकारी कर्मचार्‍यांच्‍या वरदहस्‍ताने होत असलेली घुसखोरी देशासाठी राष्‍ट्रघातक !

हिंदुस्‍थानातील विविध क्षेत्रांत अशा प्रकारच्‍या राष्‍ट्रघातक कारस्‍थानांना ऊत आला आहे. ‘बांगलादेशमधून झारखंडमध्‍ये घुसखोरी करणार्‍या घुसखोर्‍यांची ओळखपत्रे ते इथे पाऊल टाकण्‍याआधीच सिद्ध असतात’, अशी धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे. याचा अर्थ आपल्‍याच देशातील नागरिक अशा घुसखोरांना अनधिकृत मार्गाने सर्व प्रकारचे साहाय्‍य करत आहेत. हे नागरिक सरकारी कार्यालयातील कर्मचारीच असले पाहिजेत. अनंत ओझा नावाचे भाजपचे आमदार ‘बांगलादेशी घुसखोरांमुळे होणारा उपद्रव कसा घातक आहे ?’, ते सांगतात. याविषयी तिथल्‍या उच्‍च न्‍यायालयात अभियोग चालू आहेत.

झारखंडमध्‍ये अशी घुसखोरी होत असेल, तर आपल्‍या सीमा सुरक्षित आहेत, असे म्‍हणता येत नाही. तसेच सरकारी अधिकार्‍यांचा वरदहस्‍त राष्‍ट्रघातकी हालचालींना लाभला असल्‍याचे उघड होते. सरकारी यंत्रणा नियमांचे काटेकोरपणे पालन करत असेल आणि डोळ्‍यांत तेल घालून आपल्‍या भूभागाचे संरक्षण करत असेल, तर अशा घटना घडू शकणार नाहीत.

३. मुसलमान आणि ख्रिस्‍ती यांची वाढणारी लोकसंख्‍या हिंदुस्‍थानच्‍या स्‍वातंत्र्याला धोका निर्माण करणारी !

शत्रूला आपल्‍याच देशात प्रवेश देणारे जे नागरिक आहेत, ते आपल्‍या देशाचे शत्रूच आहेत. गेली अनेक वर्षे ही घुसखोरी चालू आहे. अनेक वनवासी क्षेत्रातील हिंदू मुलींना बाटवून मुसलमान करण्‍यात आले आहे. ज्‍या वेळी हिंदू स्‍त्रियांची संख्‍या मोठ्या प्रमाणावर न्‍यून होऊ लागते, त्‍या वेळी त्‍याचा परिणाम हिंदूंच्‍या लोकसंख्‍या वाढीवर होतो. धर्मांतरित झालेल्‍या हिंदु स्‍त्रीच्‍या पोटी जन्‍माला आलेली संतती ही हिंदु रहात नाही. ख्रिस्‍ती आणि मुसलमान यांचे आपल्‍या देशाशी असलेले वर्तन पहाता ते आपल्‍या देशाशी एकनिष्‍ठ आहेत, असे छातीठोकपणे सांगता येत नाही. त्‍यामुळे मुसलमान आणि ख्रिस्‍ती यांची वाढणारी लोकसंख्‍या हिंदुस्‍थानच्‍या स्‍वातंत्र्याला अन् सार्वभौमत्‍वाला धोका निर्माण करणारी आहे. ही गोष्‍ट लक्षात घेऊन देशात अशा प्रकारच्‍या घडणार्‍या घटनांना कायमचा आळा घातला गेला पाहिजे. तसेच आपल्‍या देशाच्‍या सर्व सीमा सुरक्षित ठेवल्‍याच पाहिजेत.

४. राष्‍ट्रघातक मालिका खंडित करण्‍यासाठीचा उपाय

अवैधपणे आपल्‍या देशाच्‍या सीमेत प्रवेश करू पहाणार्‍याला तात्‍काळ ठार मारणे, हाच उपाय आहे. हे विधान अनेकांना न रूचणारे असेल; म्‍हणून विरोध करण्‍याआधी राष्‍ट्रघातक मालिका खंडित करण्‍यासाठी हे पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे.

आपला देश स्‍वतंत्र करण्‍यासाठी अनेक राष्‍ट्रभक्‍तांनी आपल्‍या जिवाचा आटापिटा केला, रक्‍त सांडले, फासावर चढले, मरणप्राय यातना सहन केल्‍या. या सर्व गोष्‍टींना कवडीमोलाचीही किंमत न देता घुसखोरांना देशात येऊ दिले जाते. सर्व सुखसोयी उपलब्‍ध करून दिल्‍या जातात. नंतर तेच शिरजोर होऊन आपले सार्वभौमत्‍व, स्‍वातंत्र्य, सुव्‍यवस्‍था धोक्‍यात आणतात. ही दुष्‍ट मालिका निर्माण होऊ न देण्‍यासाठी काही कठोर पावले उचलणे नितांत आवश्‍यक आहे. त्‍यापैकी असलेले एक पाऊल, म्‍हणजे अवैधपणे देशाच्‍या सीमेत घुसखोरी करणार्‍या व्‍यक्‍तीला तिथल्‍या तिथे गोळी घालून ठार मारणे, हाच एक उपाय आहे.

५. झारखंडमधील जिहादी परिस्‍थिती निर्माण होण्‍यामागील कारण !

अवैधपणे आत शिरलेला घुसखोर आपल्‍या देशाचे नागरिकत्‍व सहजतेने प्राप्‍त करतो. त्‍यासाठी आपल्‍याच येथील शासकीय यंत्रणा त्‍याला सर्व प्रकारचे सहकार्य करते. ओळखपत्र देणे, मतदार सूचीत नाव समाविष्‍ट करणे, आधार कार्ड आणि शिधापत्रक देणे, अशी सर्व निर्बंधात्‍मक प्रावधाने सहजपणे पूर्ण केली जातात. त्‍यानंतर ते घुसखोर आहेत, हे सिद्ध करता येत नाही. झारखंडमध्‍ये आज हीच परिस्‍थिती निर्माण झाली आहे.

६. घुसखोरांना साहाय्‍य करणार्‍याला देशद्रोही ठरवून तात्‍काळ फाशी देणे क्रमप्राप्‍त !

अवैधपणे परदेशी नागरिकाला देशाचे नागरिकत्‍व प्राप्‍त व्‍हावे, यासाठी जो कुणी कोणत्‍याही प्रकारचे साहाय्‍य करील, त्‍याला देशद्रोही ठरवून तात्‍काळ फाशी देण्‍याची व्‍यवस्‍था आपल्‍याला करणे आता क्रमप्राप्‍त आहे. असे झाले, तरच हा देश सुरक्षित राहील. अन्‍यथा या देशाचे तुकडे होतील, देशाच्‍या सीमा आक्रसून जातील; म्‍हणून वेळीच सावध होऊन कठोर पावले उचलणे क्रमप्राप्‍त आहे.

संपादकीय भूमिका 

घुसखोरांकडून केल्‍या जाणार्‍या राष्‍ट्रघातक कारस्‍थानांना पायबंद घालण्‍यासाठी घुसखोरीवरच नियंत्रण आणायला हवे !