
छत्रपती संभाजीनगर – कुपोषित मुले, मुलींचा आहार, गरोदर महिला आणि त्यांचे कुटुंबीय यांची माहिती, तसेच इतर माहिती संकलित करण्याचे दायित्व असलेल्या अंगणवाडी सेविकांना सरकारने भ्रमणभाष संच दिले होते; मात्र हे संच जुने झाल्याने सतत बंद पडत होते. त्यामुळे हैराण झालेल्या अंगणवाडी सेविकांनी ते भ्रमणभाष संच परत करून नवीन संच देण्याची मागणी केली होती. यासाठी राज्यभरात आंदोलनही करण्यात आले; पण आता लवकरच अंगणवाडी सेविकांना नवीन भ्रमणभाषसंच देण्याच्या हालचाली चालू झाल्या असून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने पावले उचलण्यास प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती संंबंधित सूत्रांकडून देण्यात आली.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !