जमशेदपूर (झारखंड) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

हनुमान मंदिरावर दगडफेक ! धर्मध्वजाचा अवमान !

चौकाला बजरंग बली नाव देण्यास विरोध ! धर्मांधांकडून दुकाने आणि वाहने यांची जाळपोळ !

धर्मांधांकडून दुकाने आणि वाहने यांची जाळपोळ !

जमशेदपूर (झारखंड) – श्रीरामनवमीनिमित्त लावण्यात आलेल्या धर्मध्वजाचा एका धर्मांध संघटनेच्या सदस्यांनी अवमान केल्याच्या प्रकरणी झारखंडमधील जमशेदपूरमध्ये दोन गटांमध्ये पुन्हा हिंसाचार झाला. जमशेदपूरमधील कदम शास्त्रीनगर येथे उसळलेल्या या हिंसाचाराच्या वेळी धर्मांधांनी दगडफेक केली, तसेच अनेक दुकाने आणि वाहने यांची तोडफोड केली, तसेच गोळीबारही केला. दगडफेक करणार्‍यांनी दुकाने ६ दुकाने आणि २ दुचाकी वाहने जाळली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. पोलिसांनी दंगलग्रस्त परिसरात जमावबंदी लागू केली असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. (हिंसाचार झाल्यानंतर जमावबंदी लागू करणारे नव्हे, तर हिंसाचार होणार नाही, यासाठी दक्ष राहून कृती करणार पोलीस हवेत ! – संपादक)

(सौजन्य : Zee News)

१. अनुमाने ३ घंटे चाललेल्या या हिंसाचारात वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांच्यासह अनेक पोलीस घायाळ झाले. (३ घंटे हिंसाचार करणार्‍या धर्मांधांना पोलीस रोखू शकत नसतील, तर अशा पोलिसांना हिंदूंनी कर भरून पोसायचे तरी कशाला ? – संपादक) दगडफेक आणि गोंधळ घालणार्‍या ६० हून अधिक तरुणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

२. पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यासह संपूर्ण परिसरात अर्धसैनिक दलाचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

३. पूर्व सिंहभूम जिल्ह्याच्या उपायुक्त विजया जाधव यांनी सांगितले की, काही समाजकंटक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी नागरिकांना सहकार्य करावे. (समाजकंटकांना रोखण्यासाठी नागरिकांचे साहाय्य मागणे प्रशासनाला लज्जास्पद ! जिल्हा उपायुक्तांनी पोलिसांना समाजकंटकांना वचक बसेल अशी कारवाई करण्याचा आदेश देणे अपेक्षित आहे ! – संपादक)

४. यापूर्वी ३१ मार्च या दिवशी झारखंडमधील जमशेदपूर येथील जुगसलाई भागात श्रीरामनवमीच्या मिरवणुकीला विरोध करत धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केली होती. या वेळी त्यांनी रस्त्यावर टायर जाळले होते आणि पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली होती. पोलिसांनी श्रीरामनवमीची मिरवणूक थांबवल्याने हिंदूही संतापले होते. त्यांनी येथील बाटा चौकात हनुमान चालिसाचे पठण चालू केले होते.

(सौजन्य : TV9 Bharatvarsh) 


का झाला हिंसाचार ?

कदम शास्त्रीनगर ब्लॉक क्रमांक ३ चौकात ९ एप्रिलच्या सायंकाळी धर्मांध मुसलमानांनी मांसाने भरलेली प्लास्टिक पिशवी धर्मध्वजाच्या बांबूला बांधली होती. ब्लॉक क्रमांक २ येथील जटाधारी हनुमान मंदिरात हिंदूंच्या संघटनांची बैठक झाली. या बैठकीत येथील चौकाला ‘बजरंग बली चौक’ असे नाव देण्याचा ठरले. त्यामुळे या बैठकीवर अचानक दगडफेक चालू झाली. यानंतर हिंसाचार उसळला.

संपादकीय भूमिका

  • झारखंडमध्ये हिंदुद्रोही झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमानांचे फावते आहे. अशा प्रकारची आक्रमणे होणे, ही झारखंड मुक्ती मोर्चासारख्या हिंदुद्रोही पक्षांना निवडून सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना शिक्षाच म्हणावी लागेल !
  • हिंदूंवर असे आक्रमण होण्याला जमशेदपूर भारतात आहे कि पाकिस्तानात ?