भारताने ब्रिटनशी व्यापाराविषयीची चर्चा थांबवल्याचे वृत्त निराधार ! – भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – भारताने ब्रिटनसमवेत व्यापाराविषयीची चर्चा थांबवल्याचे वृत्त भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून फेटाळण्यात आले आहे. ‘अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे निराधार आहे’, असे भारताने म्हटले आहे.

मार्च मासामध्ये ब्रिटनमध्ये खलिस्तान्यांनी लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयावर आक्रमण केले होते. त्या वेळी ब्रिटनचे पोलीस उच्चायुक्तालयाचे संरक्षण करण्यात आणि खलिस्तान्यांवर कारवाई करण्यात अपयशी ठरले होते. यामुळेच भारताने ब्रिटनशी व्यापाराविषयीची चर्चा थांबवल्याचे वृत्त काही विदेशी माध्यमांनी प्रसारित केले होते.