
उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) – उंचगाव येथे कष्टकरी, सर्वसामान्य कुटुंबातील, तसेच मजुरी करणार्यांची संख्या अधिक आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट असतांनाही उंचगावमधील वीज वितरण शाखेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी मार्चचे कारण सांगून वीजवसुली करतांना त्यांची वीज बंद करत होते. देयक दिल्यावर केवळ २ – ३ दिवसांत वीजदेयक भरण्याची सक्ती केली जात होती, तरी या संदर्भात उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) महावितरण कार्यालयाच्या दारात करवीर ठाकरे गटाने निदर्शने करून संबंधित अधिकार्यांना जाब विचारला. करवीर ठाकरे गटाच्या वतीने मागण्यांचे निवेदन उपकार्यकारी अभियंता रामेश्वर कसबेकर यांना देण्यात आले.
या वेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, विक्रम चौगुले, दीपक पाटील, हिंदुत्वनिष्ठ शरद माळी, राहुल गिरूले, फेरीवाला संघटनेचे कैलास जाधव यांसह अन्य उपस्थित होते.
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न