गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी ३२ जणांवर गुन्हा नोंद !

वडीगोद्री (जिल्हा जालना) – अंबड तालुक्यातील आपेगाव, साष्टपिंपळगाव, गोंदी सिद्धेश्वर पॉईंट या ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्टर केणीद्वारे अवैध वाळू उपसा आणि साठा करणार्‍या ३२ जणांवर गोंदी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गोंदी येथील सिद्धेश्वर पॉईंट येथील ७० ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेला साठा पोलीस वसाहतीत हलवण्यात आला आहे, अशी माहिती अंबड येथील तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली.

या प्रकरणी सादिक शेख, जुबेर शेख, अदनान शेख, समीर शेख, एजाज शेख, ईश्वर लहोरे, जुगन विठोरे, लहू कटे, दादासाहेब राक्षे, गजू मोरे, महेश बाळू चौधरी, कैलास चौधरी, संतोष कांबळे, संभाजी खराद यांच्यासह ३२ जणांना अटक करण्यात आली आहे.