
मुंबई – वाघ आणि बिबटे यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तर जंगलाचे क्षेत्र न्यून होण्याचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. त्यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाचे प्रसंग निर्माण होत आहेत. हा संघर्ष टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्था उभी करणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यांत बिबट्यांमुळे सर्वसामान्य जनतेला विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याविषयी आमदार जयंत पाटील यांनी १७ मार्चला विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘‘विभाग, वनपरिक्षेत्र आणि परिमंडळ या स्तरांवर ‘वन्यजीव वाचवा पथका’ची स्थापना करण्यात आली. बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात क्षेत्रीय कर्मचार्यांकडून गस्ती पथकाद्वारे नियमित गस्त घालणे, तसेच जनजागृती यांद्वारे प्रबोधन करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.’’ या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य अनिल बाबर, संजय कुटे यांनी सहभाग घेतला होता.
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री