
बेळगाव – प्रवाशांच्या सोयीसाठी, तसेच वेळेत बचत होण्यासाठी ९ मार्चपासून बेळगाव-कोल्हापूर या मार्गावर प्रत्येक अर्ध्या घंट्याला विनाथांबा बससेवा चालू करण्यात येत आहे. बेळगाव आणि चिकोडी आगारातून नवीन १२ गाड्या या मार्गावर धावणार आहेत. सध्या या मार्गावरील गाड्या बेळगाव, हत्तरगी, संकेश्वर, निपाणी येथून कोल्हापूरला येत होत्या. आता विनाथांबा गाडी उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार्या या गाड्या प्रतिदिन सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० पर्यंत उपलब्ध असणार आहेत. या गाड्यांसाठी तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसून नेहमीच्याच दरात या गाड्या प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अमेरिकेने सर्वांत मोठ्या सैनिकी कमांडमधून ‘इंडो’ शब्द काढला !
गोव्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद सावकार यांचे निधन
(म्हणे) ‘संघवाले हिंदू नाहीत, तर केवळ हिंदुत्ववादी आहेत !’ – Yathindra Siddaramaiah
Delhi-NCR : देहली-एन्.सी.आर्.मध्ये मोठ्या आक्रमणाचा कट उधळला
Petrol Bombs At RSS : रांची (झारखंड) येथील रा.स्व. संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी फेकले पेट्रोल बाँब !
BJP MLA C.T. Ravi – संघ ही व्यक्तीला राष्ट्रभक्ती शिकवणारी संस्था : नोंदणीची आवश्यकता नाही !