
सोलापूर – येथे २६ फेब्रुवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘हिंदु गर्जना मोर्च्या’चे आयोजन करण्यात आले होते. मोर्च्याच्या वेळी दुकानांवर बाटल्या फेकल्याच्या प्रकरणी मोर्च्याच्या संयोजकांसह २० जणांवर फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला. याविषयी महिला पोलीस उपनिरीक्षक राधा नारायण जेऊघाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोर्च्याचे आयोजक अंबादास गोरंटला, रंगनाथ बंकापुरे, पुरुषोत्तम कारकल, रवी गोणे यांच्यासह २० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विकास देशमुख अन्वेषण करत आहेत. (हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हे नोंद करण्यास तत्परता दाखवणारे पोलीस रामनवमी, हनुमान जयंती यांच्या मिरवणुकांवर आक्रमण करणार्या धर्मांधांवर गुन्हे नोंदवण्यास अशी तत्परता दाखवतात का ? – संपादक)
गुन्हे मागे घ्या, अन्यथा उच्च न्यायालयात जाऊ ! – धनंजय देसाई, संस्थापक, हिंदु राष्ट्र सेना

हिंदु गर्जना मोर्च्यात घडलेल्या अप्रिय घटनेला उत्तरदायी धरून पुरावे नसतांना संयोजकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत. अन्यथा उच्च न्यायालयात जाऊ, अशी चेतावणी हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत