
मुंबई, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – इयत्ता १२ वीच्या उत्तरपत्रिका वेळेत पडताळून होण्यासाठी संबंधित अधिकार्यांना सूचना देण्यात येतील, तसेच त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना काढण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत दिले. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी १२ वीच्या ५० लाख उत्तरपत्रिका पडताळल्याविना पडून असल्याचे सूत्र सभागृहात उपस्थित केले. निकाल वेळेवर लागला नाही, तर आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होईल, हा विषय माहितीच्या सूत्राच्या अनुषंगाने सभागृहात उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक