(म्हणे) ‘पी.एफ्.आय. प्रमाणेच बजरंग दल आणि विहिंप यांच्यावरही बंदी घाला !’ – मौलाना तौकीर रझा खान

(मौलाना म्हणजे इस्लामी अभ्यासक)

चंडीगड (हरियाणा) – राज्यातील भिवानी येथे २ गोतस्करांचे शव मिळण्याच्या घटनेवरून ‘इत्तेहाद-ए-मिल्लत काउंसिल’ या इस्लामी संघटनेचे प्रमुख मौलाना तौकीर रझा खान यांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आतंकवादी संघटना घोषित करण्याची मागणी केली आहे. ‘ज्याप्रकारे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर प्रतिबंध घालण्यात आला, त्या प्रकारेच बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद या संघटनांवरही बंदी लादण्यात यावी’, असेही तौकीर रझा म्हणाले.

१. रझा म्हणाले की, भिवानीमध्ये १६ फेब्रुवारी या दिवशी गोतस्करांची हत्या करण्यात आली. आम्ही तेव्हा गप्प होतो; परंतु जेव्हा बैठका आणि महापंचायतीत आरोपींची बाजू घेण्यात आली, त्या वेळी असे वाटले की, आता समूहहत्या सामान्य झाले आहे.

२. याआधीही तौकीर रझा यांनी अनेक हिंदुविरोधी वक्तव्ये केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी ‘कलमा’ वाचून इस्लाम समजून घेण्याचा फुकटचा सल्लाही याच रझा यांनी दिला होता. या माध्यमातून त्या दोघांनी इस्लाम स्वीकारण्याविषयी त्यांनी म्हटले होते. ‘कलमा’ हे इस्लाममधील असे द्वार आहे, जे वाचून कुणीही मुसलमानेतर इस्लाम स्वीकारू शकतो.

संपादकीय भूमिका 

‘क्रूरकर्मा औरंगजेब हा जगातील सर्वाेत्कृष्ट राजा होता’, अशा प्रकारे गरळओक करणार्‍या मौलाना तौकीर रझा खान यांनी अशी मागणी करणे यात काय आश्चर्य !