
संभाजीनगर – गंगापूर साखर कारखाना निवडणुकीत भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला असून शिवसेना (ठाकरे) गटाने संपूर्ण २० जागांवर विजय मिळवला आहे. या पराभवाविषयी आमदार प्रशांत बंब म्हणाले की, बारामतीच्या काकांनी (खासदार शरद पवार यांनी) राज्यात भ्रष्टाचाराचे अड्डे बनवून ठेवले असून त्यांच्या अनुयायांच्या खोटेपणाला आणि त्यांनी पसरवलेल्या अफवांना शेतकरी, सभासद अन् नागरिक बळी पडत आहेत, असा आरोप त्यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केला.
बंब पुढे म्हणाले की, गंगापूर साखर कारखान्याच्या निवडणुकीत १ सहस्र मतांच्या भेदाने आमच्या पॅनलचा पराभव झाला आहे. तरीही सहस्रो मतदारांनी विश्वास ठेवल्याविषयी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या राज्यात काही राजकारणी लोकांचा महिमा गेल्या ५५ वर्षांपासून चालू आहे. त्याचे प्रमुख सूत्रधार बारामती येथील काका आहेत. ते आणि त्यांचे अनुयायी मराठवाड्यात सहकारी संस्था आणि बँका यांच्यावर पगडा ठेवून भ्रष्टाचाराचे अड्डे बनवून ठेवले आहेत. त्यांच्याकडून प्रचंड लूट करण्यात येते. तसाच प्रयोग गंगापूर कारखाना निवडणुकीत झाला आहे.
Congress Justifies Emergency Mindset : (म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’ – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत
बाबर, अकबर, हुमायून आदी आक्रमकांचे संग्रहालय बांधून त्याद्वारे त्यांची क्रूरता दाखवा ! : Sangeet Singh Som
Kolkata Airport Masjid : कोलकाता विमानतळावरील ‘बांकरा मशिदी’चे स्थलांतर होणार
गोव्यातील भूमी बळकावल्याच्या प्रकरणांत उपनिबंधक कार्यालयांची चौकशी होणार
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !