काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे देशातून आतंकवाद संपवण्यासारखे ! – राहुल कौल, यूथ फॉर पनून कश्मीर

श्री. राहुल कौल, यूथ फॉर पनून कश्मीर

कलम ३७० हटवल्यानंतर आतंकवादाच्या मोठ्या घटना बंद झाल्या. दगडफेक थांबली; पण हिंदूंना अजूनही वेचून मारले जात आहे. सरकार सॉफ्ट टेररिझम (सौम्य आतंकवाद) मान्य करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे देशात चुकीचा संदेश जाऊ शकतो. सरकारच्या या धोरणामुळे अन्यत्र छोटे काश्मीर निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करणे म्हणजे पूर्ण देशातून जिहादी आतंकवाद संपवण्यासारखे आहे.