‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’च्या कोल्हापूर येथील संपर्क कार्यालयाचे उद़्घाटन !

कोल्हापूर, १६ जानेवारी (वार्ता.) – कणेरी येथील सिद्धगिरी मठावर २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ७ दिवस भव्य आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवासाठी शासनाचे पूर्ण सहकार्य असून त्यासाठीच्या प्रशासकीय बैठका चालू आहेत. गेली काही वर्षे आपण पहात आहोत की, सातत्याने पर्यावरणाचा र्हास होत आहे. मुंबईचे प्रदूषण वाढत आहे, शाळा बंद ठेवण्याइतकी वाईट अवस्था देहलीची झाली होती. नद्या प्रदूषित होत आहेत. पंचगंगा ही देशातील ५ प्रमुख प्रदूषित नद्यांपैकी एक आहे. अशा स्थितीत पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठी या महोत्सवांची अत्यावश्यकता आहे, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी दिली. १४ जानेवारीला ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’च्या कोल्हापूर येथील संपर्क कार्यालयाचे उद़्घाटन झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी, डॉ. संदीप पाटील, शिवसेना खासदार (शिंदे गट) श्री. संजय मंडलिक, ‘बी न्यूज’चे संपादक श्री. चारुदत्त जोशी, पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे उपस्थित होते.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)