राष्ट्रीय जनता दलाचे बिहार प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांचे द्वेषपूर्ण विधान !

पाटलीपुत्र (बिहार) – भारताची भूमी राममय आणि कृष्णमय मानली जात होती. आता हे सर्व नष्ट झाले आहे. आता राम रामायणातून पळून जातील. कणाकणांतून निघून जातील. राम आता भारताचा रहाणार नाही. आता केवळ एका मंदिरात राम राहील. द्वेषाच्या भूमीवर राममंदिराची निर्मिती होत आहे. राम त्याच एका मंदिरात बसेल. राम लोकांच्या हृदयांमध्ये नाही, तर दगडांमध्ये राहील. संघवाले हेच करत आहेत. आम्ही ‘रामवाले’ आहोत, ‘जय श्रीरामवाले’ नाही. संघवाल्यांचे राम कुठेही बसतील, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी केली आहे. अयोध्येतील भव्य श्रीराममंदिराच्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
जगदानंद सिंह पुढे म्हणाले की, उन्माद करणारे रामाला बंदी बनवतील; मात्र रामाचा वास शबरीच्या झोपडीत आहे. भारतीय जनता युगांपासून रामायणाचा पाठ करत आली आहे. सकाळ-संध्याकाळ रामनाम जपत आहे; कारण त्यात जनतेला राम भेटतो. संघाला हे ठाऊक नाही की, लोकांच्या हृदयातील राम खेचून तो दगडांच्या प्रशस्त भवनामध्ये बंदी करून ठेवू शकत नाही.
संपादकीय भुमिका
|
श्रीराममंदिरामुळे देशाच्या विकासाला गती !
Bihar Hijab Ban : दागिन्यांच्या दुकानांत आता हिजाबबंदी !
सनातन अस्मितेचा विजय : ‘केस फॉर राम : द अनटोल्ड इनसाईडर्स स्टोरी’ या पुस्तकातून उलगडला इतिहासाचा सुवर्णक्षण !
सुख, समृद्धी, रक्षण आणि न्याय हे सुराज्यासाठी आवश्यक घटक !
Haribhushan Thakur On Hijab : भारतात हिजाबवर बंदी घालणे आवश्यक ! – हरिभूषण ठाकूर बचौल, नेते, भाजप
हुमायू कबीर यांना अटक करा ! – अयोध्येतील संतांची मागणी